शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

नऊ गुंठ्यांसाठी शामरावचा घात

By admin | Published: August 01, 2016 12:47 AM

पत्नीच बनली वैरी : बेवारशांना आधार देणाऱ्या वारकऱ्यावर ‘बेवारस’ अंत्यसंस्कार

एकनाथ पाटील / कोल्हापूर ज्याला कोणी नाही, त्याला मदतीचा हात देणे, बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे पंढरीचे वारकरी शामराव पांडुरंग फडतरे (वय ४०, रा. पाचगाव, ता. करवीर) यांचा खून नऊ गुंठे जमिनीसाठी झाला. ही जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याने पत्नीनेच त्यांचा घात केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या घटनेने पाचगाव परिसर हादरून गेला आहे. पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शामराव फडतरे यांचा खून झाल्याचे उघड होताच जिल्ह्णात खळबळ उडाली. तासगाव पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला. शामराव फडतरे दारूच्या नशेत पत्नी सुमन फडतरे हिचा छळ करीत होते. या छळाला कंटाळून तिने बहिणीचा मुलगा रणजित पाटील व त्याच्या साथीदाराच्या मदतीने त्यांचा खून केला. आरोपींनी दिलेले खुनाचे कारण फक्त निमित्त आहे. शामराव फडतरे हे माळकरी असल्याने ते निर्व्यसनी होते. नऊ गुंठे जमीन आपल्या नावावर करून देण्यासाठी पत्नी सुमन हिने तगादा लावला होता. त्यास ते नकार देत होते. यातून त्यांच्यात वारंवार वादावादी होत होती. जमीन आपल्या नावावर करून देण्यास नकार देणाऱ्या पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी सुमनने बहिणीच्या मुलाची मदत घेतली. शामराव फडतरे यांचे आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यांना सहा भाऊ, आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पाठोपाठ दोन भावांचे निधन झाले. त्यामुळे तिघे भाऊ स्वतंत्र राहात. ते इमारत बांधकामाची कामे घेत होते. १९९८ मध्ये त्यांचे तुरंबे (ता. राधानगरी) येथील सुमन हिच्याशी लग्न झाले. छोटेखानी कौलारू घरामध्ये त्यांचा संसार चांगला फुलला होता. त्यांचा मुलगा शंतून सध्या अकरावीमध्ये शिक्षण घेतो. शामराव हे मनमिळावू, लोकांमध्ये मिळून-मिसळून वागणारे असल्याने त्यांची वारकरी अशी ओळख पाचगाव परिसरात होती. सेंट्रींगच्या कामातून फावल्या वेळेत ते समाजसेवाही करीत होते. मानव सेवा संस्थेमध्ये सदस्य असल्याने ते बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत होते. पाचगाव परिसरात ज्याला कोणी नाही त्याला शामराव मदतीचा हात देत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांमध्ये आदर होता. शामराव यांची पाचगाव परिसरात आठ गुंठे जमीन आहे. ती मोक्याची असल्याने आपल्या नावावर करण्यासाठी पत्नीने तगादा लावला होता. यातून त्यांच्यात नेहमी वादावादी होत होती. एकुलता एक मुलगा शंतनूच्या भविष्याचा ते विचार करीत होते. त्यामुळे ते पत्नीच्या नावे जमीन करण्यासाठी राजी नव्हते. जमीन मोक्याची असल्याने पत्नी सुमन व बहिणीचा मुलगा रणजित यांचा त्यावर डोळा होता. यातून त्यांनी खूनाचा कट रचला आणि बेंदरला जेवणासाठी गुडाळला येण्यासाठी रणजितने निमंत्रण दिले आणि तो प्रवास त्यांचा अखेरचा ठरला. खुनानंतर पत्नीचा बिनधास्त वावर शामराव यांच्या खुनानंतर पत्नी सुमन पाचगावमध्ये बिनधास्त वावरत होती. शामराव कुठे दिसत नसल्याने शेजारी राहणारे लोक, त्यांचे मित्र तिच्याकडे विचारपूस करीत होते. त्यावर ती कामावर गेलेले परत आलेले नाहीत, असे सांगत होती. परिसरात हळहळ शामराव फडतरे यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद कर्नाटक पोलिसांत आहे. त्यांचे नातेवाईक मिळून न आल्याने पोलिसांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. गेली दहा वर्षे बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या शामराव यांच्यावरही बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.