शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

शिरोलीत महापौरांच्या विरोधात शंखध्वनी

By admin | Published: July 29, 2016 12:52 AM

हद्दवाढीला तीव्र विरोध : तीन आमदारांना पाठिंबा, भाजीपाला, दूध यांसारख्या सुविधा बंद करण्याचा इशारा

शिरोली : हद्दवाढीच्या विरोधात शिरोलीतील कृती समिती आणि सर्व पक्षांच्यावतीने गुरुवारी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत चौकात कोल्हापूरच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्या विरोधात शंखध्वनी आंदोलन करण्यात आले.कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीची अधिसूचना शासनाने बुधवारी काढण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता. हे आमदार सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांना कळल्यानंतर तिघांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन १८ गावांतील ग्रामीण जनतेचा हद्दवाढीला तीव्र विरोध आहे. तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचाही विरोध आहे. तरी ग्रामीण जनतेच्या विरोधात जाऊन हद्दवाढीची अधिसूचना शासनाने काढू नये, अशी विनंती या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केली.यावर अधिसूचना रद्द झाली. बुधवारी महापालिकेच्या सभागृहात महापौर अश्विनी रामाणे यांनी हद्दवाढीला विरोध करणाऱ्या तिन्ही आमदारांचा निषेध केला. म्हणून शिरोलीतील हद्दवाढ विरोधी कृती समिती आणि सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजता शिरोली ग्रामपंचायत चौकात जमून हद्दवाढीच्या विरोधात तीव्र घोषणा देत महापौर अश्विनी रामाणे यांचा निषेध करीत शंखध्वनी आंदोलन केले.यावेळी कृती समितीचे महेश चव्हाण यांनी आम्हाला हद्दवाढीत या म्हणणाऱ्यांनी शहरातील उपनगरे अगोदर सुधारावीत, मग हद्दवाढ मागा. एकदा शिरोलीत येऊन बघा, तुमच्या शहरापेक्षा आमच्या इथे चांगल्या सुविधा आहेत. शहराला सुविधा मिळत नाहीत, मग आम्हाला काय देणार. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाजीराव पाटील यांनी ग्रामीण जनतेला शहरातील सुविधा देऊ नका, असे वक्तव्य करणारे माजी उपमहापौर बाबा पार्टे यांचा चांगलाच समाचार घेतला. ग्रामीण जनता आहे म्हणून शहर आहे. आम्ही भाजीपाला, दूध यांसारख्या सुविधा बंद केल्या, तर तुम्ही अडचणीत याल. आम्हाला डिवचाल तर याद राखा, असा इशारा पाटील यांनी दिलाया आंदोलनात ज्योतिराम पोर्लेकर, सरदार मुल्ला, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, शिवसेना शहरप्रमुख राजकुमार पाटील, सलीम महात, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, तंटामुक्तचे अध्यक्ष सतीश पाटील, मेडिकल असोसिएशनचे संचालक प्रल्हाद खवरे, डॉ. सुभाष पाटील, रणजित केळुसकर, बाजार समिती सदस्य सुरेश पाटील, विजय जाधव, गोविंद घाटगे, सुनील पाटील, दीपक यादव, विनोद अंची, लियाकत गोलंदाज, शिवाजी खवरे, शिवाजी कोरवी, सागर कौंदाडे, राजू सुतार उपस्थित होते. (वार्ताहर)कोल्हापूर शहर कुणा एकट्याचे नाही, उद्या आम्ही शिरोलीकर शहरात येतो. अडवून दाखवा आणि ग्रामीण जनतेला पाणी देऊ नका म्हणणारे बाबा पार्टे शहरात काळम्मावाडीची येणारी पाईपलाईन ही ग्रामीण भागातूनच येत आहे. त्यामुळे शहराचा भविष्यातील पाणी प्रश्न ग्रामीण भागावरच अवलंबून आहे. ग्रामीण जनतेची बससेवा बंद करा म्हणणाऱ्या नेतेमंडळींना माहिती नाही की, केएमटी आजूबाजूच्या खेड्यांमुळे चालली आहे, अन्यथा ती कधीच बंद पडली असती. त्यामुळे ग्रामीण जनतेला भडकवू नका, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाजीराव पाटील यांनी दिला.