शहरं
Join us  
Trending Stories
1
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
3
Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया
4
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
5
जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास
6
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
7
इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले
8
हस मत पगली प्यार हो जाएगा! कॅप्टन कूल धोनीचा स्वॅग; ४३ वर्षीय माहीच्या फोटोची एकच चर्चा
9
बिग बॉस शोचा करिअरवर काय परिणाम होतो?; अभिनेत्याने सांगितलं 'सत्य', म्हणाला....
10
भारताने मालिका आधीच जिंकली; आज ३ मोठे बदल होण्याची शक्यता, अशी असेल Playing XI
11
Arkade developers share: लिस्टिंगच्या दिवशी ४८% टक्क्यांनी वधारलेला शेअर; आता तिमाही निकालानंतर पुन्हा बनला रॉकेट
12
PAK vs ENG : "पाकिस्तानला WTC मधून काढून टाका, गोंधळ लवकर थांबवा", दारुण पराभवानंतर अख्तर संतापला
13
कोजागरी पौर्णिमेला बुधादित्य राजयोग: ८ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न, पैशांची बचत शक्य; लाभच लाभ!
14
उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार
15
३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला IPO, आता SEBIनं लिस्टिंगवर घातली बंदी; पुढे काय?
16
देवदूत बनून आला पायलट! हायड्रोलिक खराब, ३ तास हवेतच घिरट्या, १४० जणांच्या जीवाला होता धोका; नेमकं काय घडलं?
17
Sanjay Raut : 'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला
18
Multibagger Stock: केवळ एका वर्षात ₹१ लाखाचे बनले ₹२० लाख; 'या' SME कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
T20 WC FINAL : मी दुखापतीचं नाटक केलं आणि खेळ मुद्दाम थांबवला; पंतने सांगितला वर्ल्ड कपमधील किस्सा
20
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा

शरद पवार यांनी सांगूनही राष्ट्रवादी देणं विसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:25 AM

कोल्हापूर : आमच्यासाठी विधानपरिषद कधीच महत्त्वाची नव्हती, तो जीवन-मरणाचा प्रश्नदेखील नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील बैठकीत ठरल्याप्रमाणे शरद पवार यांनी ...

कोल्हापूर : आमच्यासाठी विधानपरिषद कधीच महत्त्वाची नव्हती, तो जीवन-मरणाचा प्रश्नदेखील नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील बैठकीत ठरल्याप्रमाणे शरद पवार यांनी सव्वा वर्षांपूर्वी बारामतीत बोलावून घेत विधानपरिषदेची एक जागा देऊ, असे स्वत: सांगितले होते. लोकसभेला केलेल्या मदतीच्या बदल्यात हे राष्ट्रवादी देणे लागत होती, पण आता ती देणे विसरली आहे, अशी टीका स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांवर शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

राजू शेट्टी हे सध्या राज्य सरकारविरोधात पूरग्रस्तांनी काढलेल्या पदयात्रेचे नेतृत्व करत आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत या आमदारांच्या नियुक्तीबाबत सकारात्मक निर्णय लवकरच होणार आहे. पण या १२ जणांच्या यादीत राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टीचे नाव कापण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लोकसभा निवडणूकीपुर्वी दिल्लीत शरद पवार यांच्यासमवेत माझी बैठक झाली होती. यावेळी लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली होती, पण पवार यांनी लोकसभेऐवजी विधानपरिषदेवर घेऊ, असा पर्याय दिला होता. जून २०१९मध्ये बारामतीमध्ये स्वत: पवार यांनी बोलावून घेत विधानपरिषदेसाठी तुमचे नाव राष्ट्रवादीच्या कोट्यातून देत असल्याचे सांगितले आणि ही जागा तुम्ही स्वत: स्वीकारावी, असेही सांगितले. पण त्यानंतर पुढे सव्वा वर्षात यासंदर्भात मी कुणालाही भेटलो नाही, चर्चा केली नाही, भेटलो असेल तर पुढे येऊन सांगावे. विधानपरिषद आमच्यासाठी महत्त्वाची नाही, आमदारकी आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न कधीच नव्हती. फक्त राष्ट्रवादी देणं लागत होती, ते त्यांनी दिले नाही. सध्या पूरग्रस्तांच्या प्रश्नाशिवाय आमच्यादृष्टीने काहीही महत्त्वाचे नाही.