शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

शरद पवार तब्बल २९ वर्षांनंतर रेल्वेने प्रवास करतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 1:54 PM

माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चक्क रेल्वेने प्रवास केला. मुंबईत एक महत्वाचे काम असल्याने पवार यांनी तब्बल 29 वर्षांनी 'कोल्हापूर ते मुंबई' असा रेल्वेप्रवास केला.

मुंबई - माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चक्क रेल्वेने प्रवास केला. मुंबईत एक महत्वाचे काम असल्याने पवार यांनी तब्बल 29 वर्षांनी 'कोल्हापूर ते मुंबई' असा रेल्वेप्रवास केला. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या पवार यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला होता. यापूर्वी रेल्वेने कधी प्रवास केला? असा प्रश्न पवारांना विचारला, त्यावर 1989 साली महापुराच्या पाहणीसाठी आलो होतो, त्यावेळी आपण रेल्वेने प्रवास केल्याची आठवण पवार यांनी सांगितली. पवारांचा हा रेल्वेप्रवास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

देशाचे नेते असलेले पवार वाढते वय आणि शारीरिक स्वास्थतेची नेहमीच काळजी घेतात. त्यामुळेच, ते दूरचा प्रवास हा खासगी जेट, हॅलिकॉप्टर आणि जवळचा प्रवास शक्यतो, स्वत:च्या कारने करतात. पवार हे शुक्रवारी 27 जुलै रोजी दिल्लीहून पुण्याला विमानाने, तर रात्री पुण्याहून कोल्हापूरला कारने आले. शनिवारी दिवसभरातील कार्यक्रम आटोपून त्यांना रविवारी सकाळी मुंबईत पोहोचायचे होते. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर किंवा विमान उड्डाण करू शकणार नाही, याचा अंदाज येताच त्यांनी शनिवारी रात्रीच महालक्ष्मी एक्स्प्रेसने जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शनिवारी महालक्ष्मी एक्स्प्रेस निघण्यापूर्वी सायंकाळी साडेसात वाजता रेल्वे स्थानकावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर श्वानपथकही दाखल झाले. रात्री सव्वाआठ वाजता शरद पवार यांची कार रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरुन थेट बोगीजवळ पोहोचली. त्यावेळी शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार गाडीतून खाली उतरले. रेल्वे स्थानकावर अगोदरच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे पवार काही मिनिटांसाठी रेल्वे स्थानकावर थांबले. त्यांच्यासोबत आमदार हसन मुश्रीफ, के.पी. पाटील, ए.वाय.पाटील, आर.के.पोवार हे कार्यकर्ते बोलत थांबले होते. तर रेल्वेतील वरिष्ठ अधिकारीही स्थानकावर उपस्थित होते. पवार यांना बोगीत चढण्यासाठी खास जिनाही लावण्यात आला होता. 

शरद पवारांना पाहून रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. तर यावेळी बोलताना रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेबाबत शरद पवार यांनी उल्लेख केला. रेल्वे स्थानकावर बरीच सुधारणा झाल्याचेही पवार म्हणाले. तर लोकांची गर्दी वाढत चालल्यामुळे मुश्रीफ यांनी शरद पवार यांना ‘साहेब, गाडीत बसा’ असा सल्ला दिला. त्यावेळी शरद पवार यांनी सर्वांना हात जोडून नमस्कार करीत कोल्हापूरला रेल्वे स्थानकातून बाय-बाय केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारrailwayरेल्वेNCPराष्ट्रवादी काँग्रेस