शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

मराठीतून शिक्षण, ऑस्ट्रेलियाकडून संशोधनासाठी शिष्यवृत्ती; शर्मिलीने बनवला गूळ उत्पादनात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 12:14 PM

भविष्यात पाण्याची टंचाई एवढी भासेल की ऊस लावता येणार नाही म्हणून ज्वारी, बीट, कलिंगडपासून गूळ उत्पादन करणार आहेत.

विश्वास पाटील

कोल्हापूर : कागलच्या सरलादेवी माने हायस्कूलमधून मराठीतून दहावी शिकलेल्या मुलीस चक्क ऑस्ट्रेलिया देशाने संशोधनाबद्दलची शिष्यवृत्ती द्यावी.. त्यांनी तिथे सात वर्षे जाऊन संशोधन करावे.. त्या देशाने त्यांना नागरिकत्व देतो; परंतु तुम्ही आमच्याच देशात राहून यापुढील संशोधन करा, असा आग्रह धरावा; परंतु मी जिथे शिकले, वाढले, त्याच मातीसाठी काहीतरी करणार ही भावना घेऊन परत यावे आणि आता गूळ उत्पादनातील महाराष्ट्राचा ब्रॅण्ड बनावा एवढे उत्तुंग कर्तृत्व गाजवले आहे त्या शर्मिली प्रताप माने यांनी आज त्या प्युअरमी या नावाने शंभर टक्के सेंद्रिय गुळाचे उत्पादन करतात.कागल, वंदूर, पिंपळगाव, तिरपण या गावांतील ३० शेतकऱ्यांकडून स्वत:ची उत्पादनपद्धती देऊन त्यांच्याकडून गूळ तयार करून घेतात. दरमहा किमान एक टनाहून जास्त गूळ त्या सध्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओमार्ट, दोराबजी अशा स्टोअर्समधून विकत आहेत. सध्या त्यांचा गूळ देशातील सर्व मोठ्या शहरांत उपलब्ध आहे. गुळापासूनचे आठ पदार्थ त्या तयार करतात. त्यासाठी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत त्यांचे उत्पादन युनिट आहे. गंमत वाटेल; परंतु त्यांच्या गुळाची ढेप ७ आणि १५ ग्रॅमची आहे. पावडरचा पाऊच ५ ग्रॅमपासून एक किलोपर्यंतचा आहे. काकवी एक चमच्यापासून अर्धा लिटरपर्यंत आहे. त्यास प्रचंड मागणी आहे.कोल्हापुरात शाहू महाराजांच्या आधीपासून गूळ उद्योग हा कोल्हापूरची जगभरातील ओळख आहे. या उद्योगाचे दुखणे हे की त्याच्या कोणत्याही प्रक्रियेची शास्त्रशुद्ध उत्पादनपद्धती निश्चित झालेली नाही. ती करण्याचे आणि त्यातून गूळ उद्योगाचा चेहरामोहरा बदलण्याचेच काम शर्मिली यांनी हाती घेतले आहे. त्यात त्यांना चांगले यश येत आहे. या शर्मिली जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांच्या कन्या. मुले वडिलांहून जास्त कर्तृत्ववान निघाली की त्यासारखी दुसरी श्रीमंती नाही. ही श्रीमंती भय्या व त्यांच्या पत्नी सविता यांच्या वाट्याला आली आहे.शर्मिली यांनी ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन विद्यापीठातून शंभर टक्के शिष्यवृत्तीतून पीएच.डी. केली. बायोप्रोसेसमध्ये त्यांनी एम.टेक केले. प्युअरमी ऑर्गनिक्स या कंपनीच्या त्या सीईओ आहेत. त्यांचे वय ३२ असून कागलमध्येच उद्येाग उभा करायचा म्हणून त्यांनी ठरवून लग्नही कोल्हापुरातीलच तरुणासोबत केले.बाजरीमधून प्रथिने बाजूला करून त्याचा औषध निर्मितीसाठी कसा वापर करायचा आणि ऑस्ट्रेलियातील तुरडाळीसारख्याच लुपिन या पदार्थापासून मधुमेह कमी करणारी प्रथिने वेगळी काढण्याची प्रक्रिया ही त्यांच्या नावावर पेटंट नोंद आहेत.उसापासून गूळ करतात; परंतु दिवाळीपासून त्या नारळ व पाम ट्रीपासून गूळ उत्पादन करणार आहेत. भविष्यात पाण्याची टंचाई एवढी भासेल की ऊस लावता येणार नाही म्हणून ज्वारी, बीट, कलिंगडपासून गूळ उत्पादन करणार आहेत. गूळ उत्पादनाच्या सर्व प्रक्रियेचे प्रमाणीकरण करून गुळाचा ब्रॅण्ड विकसित करण्याची त्यांची धडपड आहे. त्यात त्या नक्की यशस्वी होतील एवढी त्यांच्यात नक्कीच गुणवत्ता आहे. डोक्याला त्रास लई म्हणून अनेक गुऱ्हाळे बंद झाली. हा त्रास शोधून त्यावर उत्तर शोधण्याचा त्यांचा स्वत:शीच लढा सुरू आहे.

आई-वडिलांकडून नेतृत्व गुण, व्यवसायाची दृष्टी मिळाली. पती पीयूष देसाई यांनी वैचारिक स्वातंत्र्य दिले म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड करत आहे. त्यात माझ्यासोबत सामान्य शेतकरी आहेत. - शर्मिली प्रताप माने सीईओ, प्युअर मी ऑर्गनिक्स, कागल,

टॅग्स :kolhapurकोल्हापूर