शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

जिल्ह्याबाहेरही शिरोळचा आवाज!

By admin | Published: May 29, 2017 12:41 AM

जिल्ह्याबाहेरही शिरोळचा आवाज!

गणपती कोळी । लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा सुरूकेली आहे. सुजलेले पाय, पायाला उठलेले फोड अन् ऐन संघर्षात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोडलेली साथ अशा परिस्थितीतही नागरिकांतून शेट्टी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याबाहेर प्रथमच काढलेल्या या पदयात्रेतून शिरोळ तालुक्याचा आवाज घुमतो आहे.खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन करून शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे लढणारा एकमेव शेतकरी नेता अशी त्यांनी स्वत:ची प्रतिमा निर्माण केली आहे. ऊस उत्पादकांमध्ये जागृती निर्माण करून साखर कारखानदार व प्रसंगी शासनाविरोधात एकजूट होत ताकद निर्माण केल्याने उसाला चांगला भाव मिळवून देण्यात शेट्टी यशस्वी झाले. चळवळीला राजकीय ताकदही तितकीच महत्त्वाची मानून २००४ साली शिरोळ विधानसभा केवळ शेतकऱ्यांच्या जिवावर लढविली. राजकीय शक्ती, धनाढ्य उमेदवार, प्रस्थापितांच्या विरोधातही केवळ शेतकरी, कष्टकरी मतदारांनी एक व्होट, एक नोटही देत मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून दिले. खासदार शेट्टी यांचा वारूरोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, साखर कारखानदार यांनी जातीपासून ते पैशापर्यंत ताकद लावली. मात्र, शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहिल्याने खासदार शेट्टी यांना मागे वळून पाहावे लागले नाही. दुधाला दर मिळावा यासाठी दहा वर्षांपूर्वी खासदार शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून अकरा दिवसांची आत्मक्लेश यात्रा काढली होती. जिल्ह्यातील व शेतकरी नेता म्हणून त्यांच्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी ऊस, कापूस, तूरडाळी यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राज्यभर सभा गाजविल्या असल्या तरी स्वत:च्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर जिल्हा सोडून प्रथमच पुणे ते मुंबई पदयात्रा काढली आहे.शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या, मायक्रोफायनान्स कंपनीच्या जाचातून मुक्त करा, या प्रमुख मागण्यांसाठी पुणे ते राजभवन आत्मक्लेश पदयात्रा २२ मे पासून चालू केली आहे. ऐन संघर्षाच्या काळात संघटनेचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी साथ सोडल्याने आंदोलनाच्या नेतृत्वाची जबाबदारी एकट्यावर पडली आहे. मात्र, त्यांच्या एकटेपणाची जाणीव होऊ नये, यासाठी या पदयात्रेत शिरोळ तालुक्यातील हजारो शेतकरी कार्यकर्ते खर्डा-भाकरी, लोणच्याचा ढिगारा घेऊन पदयात्रेतील लोकांच्या सेवेसाठी जात आहेत.आपल्या तालुक्यातील लोकांच्या पाठबळाने खासदार शेट्टी भारावून जात आहेत. त्यातच शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता न्याय मिळवून देण्यासाठी पायी जात असल्याने पुणे ते मुंबई मार्गावरील ग्रामस्थ खासदार शेट्टी यांचे स्वागत करून पदयात्रेत सहभागी होत असल्याने शेट्टी यांना सुजलेले पाय, पायाला उठलेले फोड याच्या वेदना लोकांच्या प्रेमात विरून जात आहेत. त्यामुळे खासदार शेट्टी यांच्या पदयात्रेने शिरोळ तालुक्याचा आवाज पुणे ते मुंबई मार्गावर घुमत आहे.