शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

गव्याला वनअधिवासात सोडण्यात वनविभाग अपयशी, शिवसेनेने उपवनसंरक्षक काळे यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 5:00 PM

गव्याला सुरक्षितपणे लवकर त्याच्या अधिवासात सोडावे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेने दिला.

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून गवा नागरी वस्तीमध्ये फिरत आहे. त्याला सुरक्षितपणे त्याच्या अधिवासात सोडण्यासाठी तुम्ही काय केले?, तुमच्या विभागातील कर्मचारी काय करत आहेत?, अशी विचारणा करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापुरातील उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांना बुधवारी धारेवर धरले. गव्याला सुरक्षितपणे लवकर त्याच्या अधिवासात सोडावे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी दिला.वनविभागाकडून गवत आणि पाण्याची व्यवस्था होत नसल्याने गवे जंगलातून नागरी वस्तीमध्ये येत आहेत. एक गवा गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात फिरत आहे. त्यातून भुयेवाडी येथील दुर्घटना घडून एका युवकाचा बळी गेला. अजूनही गव्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात वनविभागाला यश आलेले नाही. या विभागातील अधिकारी, कर्मचारी नेमके काय करतात असा सवाल विजय देवणे यांनी उपस्थित केला.

हत्ती, गव्यासारखे वन्यप्राणी नागरी वस्तीत येणार नाहीत याबाबत उपाययोजना करण्याचे काम वनविभागाचे आहे. ते या विभागाकडून सक्षमपणे होत नसल्याचे दिसत आहे. बदल्यांच्या भानगडीत अधिकारी गुंतल्याचे दिसते. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवचन, सल्ला देण्यापेक्षा त्रुटी दूर केल्या असत्या, तर बरे झाले असते, असे संजय पवार यांनी सांगितले. ट्रंक्युलिझर गन, पुरेसे कर्मचारी आहेत का? विचारणा करत त्यांनी आवश्यक पाऊले तातडीने उचलून गव्याला त्याच्या अधिवासात लवकर सोडण्याची मागणी केली.

त्यावर उपवनसंरक्षक काळे यांनी प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत. स्वयंसेवी संस्थांची मदत होत आहे. गव्याला सुरक्षितपणे त्याच्या अधिवासात पाठविले जाईल, असे सांगितले.

यावेळी शिवसेनेचे सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे, गीता चौगुले, मंजित माने, कृष्णात पोवार, उदय सुतार, सतीश कुरणे, उत्तम पाटील, तानाजी चौगुले, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव, प्रसाद देवणे उपस्थित होते.मयत युवकाच्या कुटुंबीयांना ५० लाख द्यावेतभुयेवाडीतील मयत युवकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये द्यावेत. या कुटुंबातील एकाला वनविभागात नोकरीस घ्यावे. भुयेवाडी येथील प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी दुर्घटना पुन्हा घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, या मागणीचे निवेदन आम्ही उपवनसंरक्षक काळे यांना दिले आहे. काळे यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना कक्षाबाहेर जाण्यास सांगणे चुकीचे होते. त्याचा निषेध आम्ही केला असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेनाforest departmentवनविभाग