शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

शिवसेनेने ‘चेअरमन’ची गळपट्टी खुशाल धरावी

By admin | Published: February 01, 2015 1:01 AM

ऊसदराचे आंदोलन : कोतवालास बडवून उपयोग काय ?

विश्वास पाटील / कोल्हापूर शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव दिला नाही म्हणून साखर सहसंचालकांना सळो की पळो करून सोडण्यापेक्षा आक्रमक शिवसेनेने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही साखर कारखान्यांच्या ‘चेअरमन’ची गळपट्टी धरून दर कधी देतोस, हे विचारण्याचे खुशाल धाडस दाखवावे, त्यांच्या मागे शेतकरीही उभे राहतील, अशा प्रतिक्रिया या उद्योगातून व्यक्त होत आहेत. काल, शुक्रवारीच प्रादेशिक साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांना कार्यालयातून हाकलून देण्याचे आंदोलन शिवसेनेने केले. सत्ता तुमची, सहकारमंत्री हे कोल्हापूरचेच; जिल्ह्यातील २७ पैकी तीन वगळता सर्वच कारखान्यांनी ‘एफआरपी’ दिलेली असताना याच जिल्ह्यात हिंसक आंदोलन व्हावे हेच गमतीशीर आहे. बाजारात साखरेला दर नसल्याने ‘एफआरपी’ देणेही अडचणीचे बनले. राज्य व केंद्राच्या पातळीवर मदत मिळायला कालावधी आहे. तोपर्यंत साखर आयुक्तांच्या पातळीवर साखरजप्तीची कारवाईही झाली. अधिकार नसणाऱ्यांची गळपट्टी धरणे यात पुरुषार्थ कसला? त्यापेक्षा ‘एफआरपी’ न दिलेल्या कारखान्यांच्या चेअरमनना जाब विचारण्याचे धाडस शिवसेनेने करावे. आंदोलनातही सनसनाटीपणा शोधला जात आहे. सरकारमध्ये मंत्री असलेल्या पंकजा मुंडे, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांच्यापासून ते सत्तारूढातील पाच-पंचवीस नेत्यांचे कारखाने आहेत. ते एफआरपी देण्याचे नाव काढायला तयार नाहीत. जिल्हा पातळीवरील एखाद्या अधिकाऱ्याची खुर्ची काढून घेण्यात शिवसेना धन्यता मानत आहे.