शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

ShivSena-Vanchit Alliance: कार्यकर्त्यांच्या पातळीवर युती कितपत उतरते त्यावरच यश, राजकीय विश्लेषकांचे मत

By विश्वास पाटील | Updated: January 24, 2023 14:29 IST

ठाकरे-आंबेडकर युतीचे महाविकास आघाडीतही पडसाद उमटू शकतात

विश्वास पाटील कोल्हापूर : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेली युती कार्यकर्त्यांच्या पातळीवर कितपत उतरते यावरच या युतीचे महाराष्ट्राच्या राजकारणातील भवितव्य अवलंबून असेल, अशी प्रतिक्रिया राजकीय अभ्यासकांतून व्यक्त झाली. ही युती झाल्यानंतर ‘लोकमत’ने त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्की काय परिणाम होईल, हे जाणून घेतले. शिवसेनेतील फुटीनंतर एकटे पडलेल्या ठाकरे यांना नवीन मित्र जोडल्याचे मानसिक आधार या युतीतून मिळू शकतो.राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून परस्परविरोधी भूमिका असलेल्या लोकांशी युती करत आहेत. त्यांनी संभाजी ब्रिगेडशी आघाडी केली आहे. त्यानंतर आता आंबेडकर यांच्याशी युतीचा निर्णय घेतला. शिवसेनेतील बंडानंतरही मुंबईत ठाकरे गटाचे आजही वर्चस्व आहे. तिथे आंबेडकर यांना मानणाराही वर्ग आहे.शिवसेनेची हिंदूत्वाबद्दलची आक्रमक भूमिका राहिली आहे. आणि आंबेडकर यांचा हिंदुत्व, सावरकर विचारधारा यांना विरोध राहिला आहे. त्यामुळे हे मतभेद कसे सांधणार हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दोन्हीकडील नेत्यांना पुढाकार घ्यावा लागेल. कारण मतभेदाचे प्रदर्शन झाल्यास भाजप व शिंदे गट त्याचे भांडवल करण्यास टपून बसलेला असेल. म्हणून दोन्हीकडील नेत्यांना तोंडावर नियंत्रण ठेवावे लागेल.

राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार म्हणाले, या युतीचा जास्त फायदा शिवसेनेला होऊ शकतो. परंतु शिवसेनेचा पारंपरिक मतदार आंबेडकर यांना स्वीकारणार का, हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. आतापर्यंत परस्परविरोधी विचारधारेचे हे दोन पक्ष आहेत. त्यांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत. आंबेडकर यांचा पक्ष चळवळीशी संबंधित आहे. शिवसेना तशी प्रस्थापित वर्गाचे राजकारण करते. गावपातळीवर हे घटक एकमेकांच्या विरोधात राहिले आहेत. त्यामुळे नेत्यांतील मनोमीलन कार्यकर्त्यांच्या पातळीवर घडवून आणण्याचे आव्हान असेल.महाविकास आघाडीतही पडसादठाकरे-आंबेडकर युतीचे महाविकास आघाडीतही पडसाद उमटू शकतात, असे या दोन्ही विश्लेषकांना वाटते. कारण राष्ट्रवादी हा बहुजन समाजाच्या नावाखाली मुख्यत: मराठ्यांच्या हिताचे राजकारण करणारा पक्ष आहे. फुटीनंतर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यांना महाविकास आघाडीतील जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी नव्या युतीचा फायदा होऊ शकेल.

काही निरीक्षणे...

  • आंबेडकर यांना मानणारा मतदार शिवसेनेकडे वळेल
  • शिवसेनेचा पारंपरिक मतदार वंचितकडे वळवण्याचे आव्हान
  • दोन्ही पक्षांच्या मतदारांनी युती स्वीकारली तर त्याचा मोठा लाभ दोघांनाही
  • आंबेडकर यांना महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्ष कितपत स्वीकारतात यावर प्रश्नचिन्ह
टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी