शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा, अभिनेत्यामधील संवेदनशील कार्यकर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 12:01 IST

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांना विचारांची नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. यानिमित्ताने अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, कलारसिक असे डॉ. लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींनी अनुभवले.

ठळक मुद्देश्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा अभिनेत्यामधील संवेदनशील कार्यकर्ता

कोल्हापूर : आपल्या सशक्त अभिनयाने तमाम रसिकमनांवर अधिराज्य केलेले नटसम्राट, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यातील हळव्या मनाचा आणि संवेदनशील माणूस कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्राने अनुभवला. पुरोगामी विचारसरणीचे डॉ. लागू कलेप्रमाणेच चळवळीतही रमले. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांना विचारांची नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. यानिमित्ताने अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, कलारसिक असे डॉ. लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींनी अनुभवले.एक कलाकार म्हणून डॉ. लागूंची कारकिर्द अत्युच्च होती; पण कार्यकर्त्याचे साधेपण त्यांनी अखेरपर्यंत जपले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम केले. ‘परमेश्वराला रिटायर करा’ या संवादात्मक कार्यक्रमातून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे.

याबाबत डॉ. मेघा पानसरे म्हणाल्या, त्यावेळी मी विद्यार्थिदशेत होते आणि स्टुडंट्स फेडरेशनची कार्यकर्ती होते. या काळात डॉ. लागू यांच्या अनेक कार्यक्रमांना जाण्याचा योग आला. त्यांचे विचार कळले. ज्या पद्धतीने ते विवेक आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीने समजावून सांगायचे, ते ऐकून त्या काळात आम्ही अक्षरश: भारावून गेलो होतो. ते इतके साधे होते की कोणीही, कोणत्याही विषयावर त्यांना जाऊन प्रश्न विचारू शकत होते. लहान-मोठा, विद्यार्थी असा कोणताही भेद न करता ते सगळ्यांशी गप्पा मारायचे.अनेकदा नाटकांच्या दौऱ्यानिमित्त डॉ. लागू कोल्हापुरात यायचे. रंगमंचावर काम करणाऱ्या आणि बॅकस्टेजच्या कलाकारांचीही ते विचारपूस करायचे. त्यावेळी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचीही ते किती दखल घेतात, हे लक्षात आल्याचे रंगकर्मी सांगतात. नाट्यवितरक आनंद कुलकर्णी म्हणाले, डॉ. लागू यांच्या अनेक नाटकांचे दौरे आम्ही आयोजित केले. त्यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्याची सोय कशी होते, त्यांना दौऱ्यात काही त्रास होणार नाही ना, याचे दडपण आमच्यावर होते. ते येत होते; पण त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते.विजय टिपुगडे म्हणाले, दिल्लीत १९९८ साली कोल्हापूरच्या कलाकारांचे ‘कलापूर’ हे चित्रप्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनास डॉ. श्रीराम लागू यांनी आवर्जून भेट दिली. त्याप्रसंगी त्यांच्यासोबत डॉ. नरेंद्र दाभोलकरही होते. सर्व कलाकारांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या निमित्ताने एका कलारसिक डॉ. लागू यांचे वेगळेच दर्शन झाले.

 

 

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागूkolhapurकोल्हापूर