शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

बाबासाहेबांची स्वाक्षरी लंडनमध्ये झळकणार !

By admin | Published: December 05, 2015 11:59 PM

ऐतिहासिक दस्तावेजाचा सन्मान : साताऱ्याच्या शाळेत ७ नोव्हेंबर १९०० रोजी केली होती सही

प्रदीप यादव / सातारा ७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा हायस्कूल (सध्याचे छ. प्रतापसिंह हायस्कूल)येथे प्रवेश घेतला. या ऐतिहासिक घटनेला आता ११५ वर्षे होत आहेत. प्रवेश घेतेवेळी आंबेडकरांनी मोडी लिपीमध्ये केलेली स्वाक्षरी १ हजार ११४ व्या क्रमांकावर शाळेच्या रजिस्टरला आजही पाहायला मिळते. ही नोंद आज अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या स्वाक्षरीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ शाळाप्रवेशच झाला नाही, तर ती एक युगांतराची सुरुवात होती. ज्या स्वाक्षरीने डॉ. आंबेडकरांचा ज्ञानाच्या अवकाशामध्ये प्रवेश झाला होता, ती स्वाक्षरी आता केवळ साताऱ्यापुरती मर्यादित राहिली नसून, सातासमुद्रापार लंडनला निघाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिकत असताना ज्या बंगल्यात वास्तव्यास होते, ते निवासस्थान नुकतेच भारत सरकारने ताब्यात घेतले आहे. या निवासस्थानात संग्रहालय होणार असून, त्यामध्ये डॉ. आंबेडकरांची पहिली स्वाक्षरी झळकणार आहे. यासाठी गेली १३ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळाप्रवेश दिन सोहळ्याचे आयोजन करणारे सामाजिक, वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते अरुण जावळे प्रयत्न करीत आहेत. या स्वाक्षरीने बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाचा पाया साताऱ्यात भक्कम करून पुढे ते यशस्वीपणे शिकत राहिले. विदेशातल्या विद्यापीठांमध्ये आपल्या ज्ञानाचा अमीट ठसा उमटविला. जगद्विख्यात झाले. म्हणूनच ‘नॉलेज आॅफ सिम्बॉल’ ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या स्वाक्षरीला एक आगळंवेगळंं महत्त्व आहे. भारत सरकारने डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जयंती निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याबरोबरच त्यांच्या प्रत्येक स्मृती जतन करण्याचे धोरण अवलंबले आहे. सातारच्या मातीमध्ये डॉ. आंबेडकरांसारखा युगपुरुष शिकला, बागडला. याच मातीमध्ये त्यांनी वास्तव्य केले. या घटना सातारकरांचे ऊर भरून आणणाऱ्या अशाच आहेत. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि या स्वाक्षरीलाही आपण सलामच करायला हवा, असे मत अरुण जावळे यांनी व्यक्त केले. हा तर साताराभूमीचा गौरव आता या स्वाक्षरीला जागतिक अशा स्वरूपाचे महत्त्व प्राप्त होणार असून, जगभरातील आंबेडकर अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाळाप्रवेशाच्या दरम्यानची स्वाक्षरी लंडन येथे पाहावयास मिळणार आहे. एका अर्थाने हा सातारच्या भूमीचा, भीमाईभूमीचा गौरव आहेच; परंतु प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा अशा पद्धतीचे कार्यकर्तृत्व उभे करणाऱ्या महामानवाचाही अभिमान वाटणार आहे. ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं, या देशाला संहिता दिली, नव्हे तर त्या संहितेमुळे जगाच्या पाठीवर सर्वोत्तम अशी लोकशाही प्रणाली निर्माण केली, अशा संविधान शिल्पकाराच्या स्वाक्षरीला म्हणूनच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.