शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

Kolhapur: पुराच्या पाण्यातून शेताकडे जाताना ट्रॅक्टर उलटला, एकाचा मृत्यू; दोघे बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 12:49 PM

पाचजण सुदैवाने बचावले, बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू

कुरुंदवाड/ दत्तवाड : अकिवाट ( ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यातून जाताना ट्रॅक्टर उलटल्याने नऊजण बुडाले. एकाचा मृत्यू , एक गंभीर, तर दोघेजण बेपत्ता आहेत. अन्य पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास अकिवाट-बस्तवाड रस्त्यावर अकिवाट ओढ्यावर ही घटना घडली. सुहास पाटील (वय ५०, रा. अकिवाट) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरगदार व माजी सरपंच आण्णासाहेब हसुरे दोघेजण बेपत्ता आहेत, तर ट्रॅक्टरचालक रोहिदास माने गंभीर जखमी आहे. एनडीआरएफ व रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी एकूण सात बोटींच्या साहाय्याने दिवसभर कृष्णा नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली होती. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, तहसीलदार अनिलकुमार हेळकर घटनास्थळी दाखल झाले होते.आण्णासाहेब हसुरे यांची बस्तवाड रस्त्याला शेती असून, शेतात केळीचे पीक आहे. कृष्णा नदीच्या पुराचे पाणी या रस्त्यावर असल्याने हसुरे यांनी केळीचे घड काढण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये केळी तोडणीचे कामगार प्रदीप पाटील, अंगद मोहिते व अझहर मुजावर यांना घेऊन जात होते. ट्रॅक्टर असल्याने गावचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील, इकबाल बैरगदार, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रेणिक चौगुले, अरुण कोथळी ट्रॅक्टरमध्ये बसले, तर ग्रामपंचायत कर्मचारी अरुण कांबळे व सुहास माने चालकाला वाट दाखवत पुढे जात होते. पुलावर पुढे जात असताना पाण्याच्या प्रवाहाने ट्रॅक्टरचे चाक अलगद उचलल्याने ट्रॅक्टर उलटला.यावेळी काहीजण पोहत काठावर आले तर काहीजणांना मच्छीमारांनी बाहेर काढले. तोंडात, नाकात पाणी गेल्याने सुहास पाटील व रोहिदास माने बेशुद्ध झाले होते. त्यांना उपचारासाठी नेत असताना पाटील यांचा मृत्यू झाला तर चालक माने याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२००५ च्या महापुरातील घटनेची पुनरावृत्ती२००५ च्या महापुरात राजापूरमधील लोकांना बोटींच्या साहाय्याने बाहेर काढताना लष्करी बोट बुडाल्याने एका मुलासह दहा जणांचा मृत्यू झाला होता. याच परिसरात महापुराने पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे. त्यामुळे २००५ च्या महापुरातील घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा परिसरात होती.

बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरूबेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी कृष्णा नदीत एनडीआरएफच्या तुकड्या, रेस्क्यू फोर्स, व्हाइट आर्मीचे जवान सात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने शोधमोहीम करत होते. मात्र सायंकाळपर्यंत त्यांना यश आले नव्हते.

अन् उपसरपंच थांबलेगावचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी मृत पाटील यांच्याबरोबर उपसरपंच आप्पासाहेब म्हैशाळेही जाणार होते. मात्र सकाळीच त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात गेल्याने या दुर्घटनेतून ते वाचले. त्यामुळे काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याची प्रचिती त्यांना आल्याची गावात चर्चा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरdrowningपाण्यात बुडणे