शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

Kolhapur: ‘बाल संगोपन’मधील सहा हजारांवर बालके नियमित अनुदानापासून वंचित

By भीमगोंड देसाई | Updated: September 11, 2024 13:18 IST

एकल मुलांच्या पालकांची हेळसांड : सहा हजार बालके उपाशी

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन संगोपन योजनेतील लाभासाठी आतापर्यंत ८ हजार १६२ मुला, मुलींच्या पालकांनी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज केला आहे. यातील पात्र ठरलेल्या सहा हजार बालकांचे पालकही नियमित अनुदानापासून वंचित आहेत. दोन हजार १६२ अर्जदार मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. याचे पालक तालुका ते जिल्हा कार्यालयातील संबंधीत कार्यालयात वारंवार हेलपाटे मारत आहेत. शासनाचे काम आणि सहा महिने थांब असा अनुभव येत आहे. विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणीला दर महिने १५०० रूपये जमा करणारे शासन मात्र परिस्थितीमुळे अनाथपण आलेल्या बालकांना मात्र दर महिने २२५० रूपये निर्वाह भत्ता देण्यासाठी टाळटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे.अर्ज केल्यानंतर जिल्हयाच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन पडताळणी करून घ्यावी लागते. योजनेतील अर्जदारांची गृहचौकशी होते. विविध टप्यातील प्रक्रियेसाठी प्रचंड विलंब होत आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून पात्र ठरल्यानंतर नियमितपणे लाभाची रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. सुमारे १४०० पेक्षा अधिक पात्र मुलांना जुलै २०२३ पासून अनुदान जमा झालेले नाही. उर्वरित मुलांचे मार्च मार्च २०२४ पासून अनुदान मिळालेले नाही. 

मोबाईल उचलत नाही, कार्यालयात भेटत नाहीत..महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हयाचे कार्यालय मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये आहे. तेथील प्रमुख अधिकारी सुहास वाईंगडे कार्यालयात भेटत नाहीत आणि मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर रिसीव्ह करीत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. असे बेभरोशाचे अधिकारी महिला, बालकाचे काय कल्याण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लाभ कोणाला मिळू शकतो ?

  • शून्य ते १८ वर्षे वयोगटातील अनाथ, पालकांचा पत्ता लागत नाहीत असे किंवा दत्तक देणे शक्य नसलेले बालक.
  • एक पालक असलेले बालके.
  • कुटुंबातील न्यायालयीन वाद, तंटे, वादविवादामुळे बाधीत झालेले बालके.
  • कुष्ठरोग, जन्मठेपची शिक्षा भोगत असलेले वडीलांची, एचआयव्ही किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या पालकांची मुले.
  • दोन्ही पालक दिव्यांग असलेल्यांची मुले.

शासनाकडून अनुदान आल्यानंतर लाभार्थींच्या खात्यावर जमा केले जाते. निधी मिळण्यात अनियमितता असल्याने संगोपनाचे अनुदान देता आले नाही. लोकांना भेटण्यासाठी मी नेहमी कार्यालयात असतो. लोकांच्या तक्रारी ऐकून घेतो. -सुहास वाईंगडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर