शहरं
Join us  
Trending Stories
1
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
2
७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; इंजिनिअरला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल
3
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाचे स्टँड काढून टाकण्याचे आदेश
4
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
5
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
6
एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले
7
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
8
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
9
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
10
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
11
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
12
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
13
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
14
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
15
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
16
प्रेमाने ‘किसन’ अशी हाक मारणारे कमी झाले, पण दाराबाहेर चपला हीच श्रीमंती!
17
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
18
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
19
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
20
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता

Kolhapur: रस्त्यांसाठी २५ हजांरावर झाडांची कत्तल, वनखातेही अनभिज्ञ 

By समीर देशपांडे | Updated: March 22, 2025 15:29 IST

कंत्राटदारांवर कुणाचाच अंकुश नाही

समीर देशपांडेकोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील २० रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आतापर्यंत २५ हजार ४३४ झाडांची तोड केली आहे, परंतु या बदल्यात कंत्राटदारांनी चौपट झाडे लावायची हाेती. ती लावली का? आणि लावली तर जगली का?, याची खातरजमा कोण करणार? असे प्रश्न उपस्थित होत आहे. जोपर्यंत कंत्राटदारांची कामे सुरू आहेत, तोपर्यंतच त्यांच्याकडून ही झाडे लावून जगवून घेण्याची गरज आहे.गेल्या तीन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात चौफेर असलेल्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. कागल सातारा, केर्ले रत्नागिरी ते राष्ट्रीय महामार्ग, फुलेवाडी ते गगनबावडा, रत्नागिरी कोल्हापूर, हातकणंगले ते चोकाक, संकेश्वर आंबोली, नांदगाव नांदारी, मुदाळ तिट्टा ते यमगे, सूळये ते हेरे, बाजार भोगाव ते अनुस्कुरा, केर्ली कोतोली नांदगाव, परखंदळे कळे गगनबावडा, सांगशी खोकुर्ले, पडळवाडी ते शिये अशा २० रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. यातील काही कामे अंतिम टप्प्यात आहेत.या रस्त्यांच्या रुंदीकरणावेळी दुतर्फा असलेली अनेक झाडे तोडावी लागली आहेत. आजऱ्यासारख्या ठिकाणी तर दोन्ही बाजूच्या वडाच्या झाडांच्या कमानी होत्या. गर्द सावली देत असलेली ही अतिशय जुनी झाडेही तोडली आहेत. जिल्ह्यात या कामांसाठी मनाई असलेली ३ हजार ३०७ आणि मनाई नसलेली २२ हजार १२७ अशी एकूण २५ हजार ४३४ झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, त्या बदल्यात झाडे कुठल्या कंत्राटदाराने किती लावली आणि जगवली याची माहिती कुणाकडेच नाही.चौपट झाडे लावण्याची अटरस्त्याच्या कामासाठी जितकी झाडे तोडली जातील त्याच्या चौपट झाडे लावण्याची अट निविदामध्ये घातलेली असते. त्याच भागात किंबहुना पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा ही झाडे लावावीत अशी अट असते. परंतु, कंत्राटदार याकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. छोटी झाडे आणून लावायचे आणि फाेटो काढून ठेवायचे, असे प्रकार होत असल्याचे समजते. एकतर १०० टक्के झाडे जगत नसतात. त्यामुळे मेलेल्या झाडांच्या जागी पुन्हा नवी झाडे लावून ती जगवण्याचीच अट असताना जिल्ह्यात तसे होताना दिसत नाही. 

उपवनसंरक्षकांचे पत्रयाच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग, विशेष प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, व्यवस्थापक व प्रकल्प संचालक परियोजना कार्यान्वय इकाई या चार विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून या रस्त्यांच्या दुतर्फा गेल्या दोन वर्षांत किती झाडे लावली, याची माहिती मागवली असून, या पावसाळ्यात किती लावणार आहेत, याचीही माहिती मागवली आहे.

तोडलेली झाडे

  • मनाई असलेली ३,३०७
  • बिगर मनाई २२,१२७
  • एकूण २५,४३४
  • (मनाई असलेल्या झाडांमध्ये आंबा, फणस, वड, पिंपळ, चिंच, साग, ऐन, किंजळ यांसारख्या झाडांचा समावेश होतो.)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग