शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

कोल्हापुरातून १८९ कोटींच्या सॉफ्टवेअरची निर्यात, लोकप्रतिनिधींनी आयटी पार्कसाठी जोर लावण्याची गरज

By समीर देशपांडे | Updated: December 28, 2024 13:10 IST

अजित पवार यांची सूचना पण..

समीर देशपांडेकोल्हापूर : महाराष्ट्राच्या एका बाजूला असणाऱ्या, रांगड्या परंतु देशभरात दरडोई उत्पन्नात अग्रगण्य असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात आयटी उद्योगानेही बाळसे धरले आहे. सन २०२३-२४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून १८९ कोटी रुपयांच्या सॉफ्टवेअरची निर्यात झाली आहे. या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ एकीकडे देश-विदेशात सेवा देत असताना कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी मंत्री, खासदार, आमदारांनी आता जोर लावण्याची गरज आहे.कोल्हापूरच्या आयटी क्षेत्रासाठी असलेली ही निर्यातवृद्धीची सुखद वार्ता थेट लोकसभेत देण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातून २०१९-२० मध्ये १२८ कोटी रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात झाली होती. त्यामध्ये ५० टक्के वाढ होऊन सन २०२३-२४ मध्ये ती १८९ कोटींवर पोहोचली आहे. महाराष्ट्रात पुणे आयटीमध्ये अव्वल असून, त्यानंतर नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरेही आयटी नकाशावर ठळकपणे पुढे येत आहेत.गेली १२ वर्षे कोल्हापूरच्या आयटी पार्कबाबत नेतेमंडळींकडून घोषणा होत आहेत. परंतु, यातील प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील किमान ५० हजाराहून अधिक युवक-युवती याच क्षेत्रात पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबादसह अन्य शहरांमध्ये नोकरीस आहेत. जर का आयटी कंपन्या कोल्हापूरमध्येच आल्या तर निश्चित स्थानिकांना याच ठिकाणी रोजगार मिळणार असून, यातून कोल्हापूरच्या अर्थकारणालाही आणखी पाठबळ मिळणार आहे.

अजित पवार यांची सूचना पण..उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ ऑक्टोबर २०२३ रोजी कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी शेंडा पार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जागा हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या बदल्यात कृषी विद्यापीठाला शहराजवळ ५० हेक्टर जागा द्यावी, अशीही सूचना करण्यात आली होती. यानंतर महसूल विभागाने कृषी विभागाला पर्यायी जागा दाखवल्या. परंतु, त्या गैरसोयीच्या असल्याने कृषी विद्यापीठाने या जागेचे हस्तांतरण करण्यास मान्यता दिलेली नाही.

गेली १२ वर्षे कोल्हापूरमध्ये आयटी पार्क व्हावे, यासाठी आयटी असोसिएशन प्रयत्नशील आहे. सुरुवातीला टेंबलाई येथील जागा पार्कसाठी देणार, असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर शेंडा पार्कमधील जागा देण्याची घोषणा करण्यात आली. कोल्हापूर परिसरात ३५० हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. परंतु, शासनाचे पाठबळ नसल्यामुळे कोल्हापूरला आयटी पार्क उभारण्यावर मर्यादा येत आहेत.- शांताराम सुर्वे अध्यक्ष, आयटी असोसिएशन, कोल्हापूर 

सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही क्षेत्रांत कोल्हापूरमधील अनेक युवक-युवती देश-विदेशात कार्यरत आहेत आणि आयआयटीमध्ये शिक्षणही घेत आहेत. पण कोल्हापूरमध्ये संधी नसल्याने सर्वजण बाहेर कार्यरत आहेत. कोल्हापूरमध्ये जर आयटी हब झाले तर फक्त कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचाही विकास होणार आहे. स्थानिक व देशातील तंत्रज्ञांना संधीही मिळेल आणि पुणे, बंगळुरूसारख्या शहरांवरचा ताणही कमी होईल. समतोल विकासासाठी कोल्हापूरला आयटी हब होणे ही काळाची गरज आहे. - रविकिरण केसरकर, आरएमजी इंडिया हेड, एटॉस इविडेन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSoftware Technology Parkआयटी पार्क नागपूरITमाहिती तंत्रज्ञान