शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

ज्याचा जोर, त्याला जादा पाणी; कोल्हापुरात काही माजी नगरसेवकांनी स्वत:ची उभी केली यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 2:09 PM

शहराच्या एका प्रभागात तर पाण्याचे व्हॉल्व्ह कायमचे सोडलेले

भारत चव्हाण कोल्हापूर : शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याकरिता जशी जलवाहिनीवरील गळती कारणीभूत आहे, तसा माजी नगरसेवकांचा वितरण व्यवस्थेतील कमालीचा हस्तक्षेप देखील कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. काही नगरसेवकांनी पाणी वितरणाची स्वत:चीच यंत्रणा उभी केली असून केवळ आपल्या प्रभागाला जास्तीत जास्त पाणी पुरवठा कसा होईल याकडेच त्यांनी अधिक लक्ष दिले आहे. साहजिकच दुसऱ्या भागाला अपुऱ्या दाबाच्या पाणीपुरवठ्याचा अन्याय सहन करावा लागत आहे.कोल्हापूर शहराला वळसा घालून जाणारी पंचगंगा नदी बारा महिने वाहत आहे. कितीही कडक उन्हाळा पडला तरी पंचगंगा काठोकाठ भरलेली असते. छत्रपती शाहू महाराज यांच्या कृपेने झालेले राधानगरी धरण आणि नंतरच्या काळात झालेल्या काळम्मावाडी, तुळशी यासारख्या अन्य छोट्या छोट्या धरणांमुळे कोल्हापूरला पाण्याचा दुष्काळ कधीच जाणवला नाही. मात्र, पाणी वितरण व्यवस्थेत मात्र गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ आहे. जुन्या जलवाहिन्यांमुळे गळती मोठी असल्याने आतापर्यंत अपुऱ्या, कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे खापर गळतीवर फोडले गेले. परंतु त्याही पेक्षा अधिक गलथानपणा वितरण व्यवस्थेत असल्याचे दिसून येते.मी आणि माझा मतदार संघ एवढ्या संकुचित वृत्तीने काम करणाऱ्या काही माजी नगरसेवकांनी शहरातील पाणी वितरण व्यवस्था आपल्या मर्जीप्रमाणे राबविण्यास सुरुवात केली आहे. आपल्या मतदारांना पाणी पुरवठा मुबलक व्हावा याकरिता त्यांनी स्वत:ची यंत्रणा राबविल्याचे चित्र समोर येत आहे. प्रभागात कोठे कोठे व्हॉल्व्ह आहेत, पाणी किती वाजता येते आणि बंद होते याची त्यांनी माहिती करून घेतली आहे. किती आठ्ठ्या सोडल्या की जास्त दाबाने पाणी येते याचीही त्यांना माहिती आहे. एवढेच काय तर व्हॉल्व्ह सोडबंद करणारे पाणेसुद्धा त्यांनी खरेदी केले आहेत. हे पाणे घेऊनच काही माजी नगरसेवकांचे पगारी नोकर, कार्यकर्ते पाणी सोडबंद करतात.पाच ते सहा माजी नगरसेवकांनी अशी स्वत:ची यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे महापालिकेचे चावीवाले काहीच करू शकलेले नाहीत. आपण स्वत: व्हॉल्व्ह सोडबंद करावेत, तक्रार करावी म्हटली तर शिव्याशाप, उद्धार ठरलेलाच असतो. त्यामुळे या माजी नगरसेवकांच्या वितरण व्यवस्थेतील हस्तक्षेपाला कोणीही पायबंद घालू शकलेले नाही. म्हणूनच दुसऱ्या भागात नागरिकांना पिण्याचे पाणी अपुरे, कमी दाबाने मिळत आहे. या नागरिकांना मात्र कायम कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.सिमेंट घालून बंद केलेत व्हॉल्व्हशहराच्या एका प्रभागात तर पाण्याचे व्हॉल्व्ह कायमचे सोडलेले आहेत. सोडलेले व्हॉल्व्ह सिमेंट घालून बंद केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भागातील पाणी बंद होण्याचा प्रश्नच येत नाही. टाकीतून सोडलेले पाणी थेट घराघरात पोहोचते. याची माहिती असूनही पालिकेच्या चावीवाल्यांना गप्प बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी