शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

संशयित आरोपीच्या घरावर सोनाळीकरांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:29 AM

मुरगूड : सोनाळी, ता.कागल येथील निष्पाप वरद पाटील या बालकाच्या खूनप्रकरणी अटकेत असणाऱ्या मारुती ऊर्फ दत्तात्रय तुकाराम वैद्य याच्या ...

मुरगूड : सोनाळी, ता.कागल येथील निष्पाप वरद पाटील या बालकाच्या खूनप्रकरणी अटकेत असणाऱ्या मारुती ऊर्फ दत्तात्रय तुकाराम वैद्य याच्या संपूर्ण कुटुंबीयांवर सोनाळीकरांनी बहिष्कार टाकला आहे. यातून आज वैद्य याच्या घरातील पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन ग्रामपंचायत प्रशासनाने तोडले आहे. या कुटुंबाला कोणी कसलीच मदत करायची नाही, असा निर्णय सोमवारी ग्रामस्थांनी घेतला.

सोनाळी सावर्डे बु. येथील सुमारे दोन हजारांहून अधिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकुल व तणावपूर्ण वातावरणात रक्षा विसर्जन विधी करण्यात आला. या ठिकाणी झालेल्या शोकसभेत अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

वरद पाटीलचे दि.१७ रोजी दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याने अपहरण करून अमानुषपणे त्याचा खून केला. गेले पाच दिवस सोनाळी व आजोळ सावर्डे बु. येथे मारुती वैद्यविरुद्ध तीव्र संतापाची लाट पसरली होती. या गुन्ह्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेऊन तपासासाठी विशेष पथक नेमले आहे.

सोमवारी रक्षा विसर्जन विधी झाल्यानंतर स्मशानभूमीत शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी सत्यजित पाटील, पी .व्ही पाटील, संभाजी कुलकर्णी, साताप्पा कांबळे, सुदाम कांबळे, राहुल पाटील आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. या सभेत वैद्य कुटुंबीयाला गावातील कोणीही कसलीच मदत करायची नाही, जर कोणी केली तर त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. डीवायएसपी आर. आर. पाटील, सपोनि विकास बडवे, पीएसआय कुमार ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मुक्या जनावरांना दिले पाहुण्यांच्या ताब्यात

वरद खूनप्रकरणी अटक केलेला आरोपी मारुती वैद्य याचे कुटुंबीय घटना उघडकीस आल्यापासून गाव सोडून गेले आहे. वैद्य याच्या घरात दहा ते पंधरा जनावरे आहेत. त्याच्या वैरणीचा आणि पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. गावाने या कुटुंबाला कोणतीच मदत करायची नाही असे ठरविल्याने जनावरांना कोणीही चारा टाकण्यासाठी गेले नाही. सोमवारी गावातील प्रमुखांनी शेवटी मुक्या जनावरांचा यात काय दोष म्हणून ती सर्व जनावरे वैद्य याच्या पाहुण्याकडे पोहोचविली.

पोलिसांनी केले आवाहन

वरदच्या खुनाचा नि:पक्षपातीपणे तपास करण्याचा प्रयत्न पोलीस खाते करीत आहे. यासाठी दहा विशेष पथकांतून पन्नास अधिकारी, कर्मचारी वेगवेगळ्या मुद्यावर माहिती संकलित करीत आहेत. सोमवारी मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये परिसरातील सर्व गावांतील सरपंचांची बैठक पार पडली. यामध्ये सपोनि विकास बडवे यांनी सर्व गावामध्ये शांतता ठेवावी, शक्यतो असे मोर्चे आंदोलन करू नये, असे आवाहन केले.

तपासाची आगळीवेगळी पद्धत

वातावरण तणावपूर्ण बनल्याने आणि वरदच्या कुटुंबींयांना तपासासाठी पोलीस वारंवार बोलावीत असल्याचा आरोप काहींनी केल्याने पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून सोनाळी हे गाव तपासाचे केंद्र बनविले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. शिवाय सोनाळी आणि सावर्डे बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयात तपास वहीच ठेवली आहे. जर कोणत्याही ग्रामस्थास पोलिसांसमोर येऊन बोलण्यास अडचण वाटत असेल तर त्यांनी आपली माहिती या वहीत लिहावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सर्वांना विश्वासात घेऊन पोलिसांनी तपासकार्य सुरू ठेवल्याने तणावपूर्ण वातावरण निवळण्यास मदत होत आहे.