शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

‘स्वाभिमानी’साठी मुख्यमंत्र्यांपर्यंत सांगावा

By admin | Published: January 26, 2017 12:58 AM

जिल्हा परिषद निवडणूक : भाजपने लावली जोडणी : शिवसेनेलाही घेतले अंगावर, शेट्टी काँग्रेससोबत गेल्यास भाजप अडचणीत

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसशी हातमिळवणी करून भाजपला सत्तेपासून रोखण्याची मोर्चेबांधणी सुरू केल्याने खडबडून जागा झालेल्या भाजपने बुधवारी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत नेल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खासदार राजू शेट्टी यांना फोन करून ‘आघाडीचा विषय फार ताणवू नका,’ असे सांगावे अशा हालचाली सुरू झाल्या आहेत; परंतु स्वाभिमानी संघटना आता एवढी पुढे गेली आहे की त्यांना भाजपबरोबर जाणे शक्य नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, शिवसेनेचीही स्थिती सध्या अशीच असून संपर्क नेते अरुण दूधवडकर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर बुधवारी केलेली बोचरी टीका पाहता शिवसेनाही भाजपपासून चार हात लांब गेल्याचे मानण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत जर हे दोन पक्ष विरोधात लढले तर कोल्हापुरातही ही आघाडी होण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. शिवसेना-भाजप या युतीची महाराष्ट्राच्या राजकारणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रवेशानंतर महाआघाडी बनली. संघटनेने भाजपला ‘विश्वासार्ह मित्रपक्ष’ मानून लोकसभा व विधानसभा त्यांच्यासोबत लढविली; परंतु ताकद वाढल्यानंतर भाजपकडून संघटनेला बेदखल करण्यात येऊ लागले. जिल्हा परिषदेच्या राजकारणातही त्याचीच पुनरावृत्ती घडली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक हे आपल्यासोबत आहेत म्हटल्यावर फारशी कुणाची फिकीर केलेली नाही. संघटनेला त्याचा राग आहे. आम्ही मित्रपक्ष असतानाही आम्हाला साधे चर्चेलाही बोलाविले जात नाही आणि परस्पर आघाडीचे जागावाटप जाहीर केले गेल्याने संघटनाही आक्रमक झाली. खासदार शेट्टी यांनी हातकणंगले तालुक्यात पारंपरिक विरोधक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे यांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तिथे शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकरही या आघाडीसोबत आहेत. शेट्टी काँग्रेसच्या सोबत गेले तर ते अडचणीचे ठरू शकेल, असे वाटल्याने मग अचानक बुधवारपासून संघटनेशी वाटाघाटी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आमदार सुरेश हाळवणकर व जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्याशी संपर्क साधला व चर्चा करूया, म्हणून निमंत्रण दिले; परंतु त्यांनी हा विषय आता माझ्या पातळीवर राहिला नसून तुम्ही खासदार शेट्टी यांच्याशीच बोलावे, असे सुचविले परंतु त्यांच्याशी बोलायचे कुणी, याचे कोडे सुटेना म्हणून थेट मुख्यमंत्र्यांनीच शेट्टी यांच्याशी बोलून आघाडीबाबतचा विषय संपवावा, असे ठरल्याचे समजते. (प्रतिनिधी)महाडिक यांचीही नाराजी..स्वाभिमानी संघटनेला फाट्यावर मारण्याची भाजपची भूमिका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनाही आवडलेली नाही. त्यांनीही याबाबत चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधून संघटनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सुचविल्याचे समजते.सांगलीतही आघाडी..खासदार शेट्टी यांनी सांगलीचे काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांच्याशी मंगळवारी आघाडी करण्याबाबत प्राथमिक चर्चा केली आहे. तिथेही संघटना व काँग्रेस एकत्रित लढण्याची चिन्हे आहेत.