शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मराठा महासंघाचे वसंत मुळीक कोल्हापूर ‘उत्तर’मधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 10:52 IST

गेली अनेक वर्षे मी समाजकारण करीत आहे, परंतु आता मी कोल्हापूर ‘उत्तर’विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते प्रचंड आग्रही आहेत. त्यांच्या दबावाचा आणि आग्रहाचा विचार करून मी निवडणुकीला सामोरा जाणार असल्याची घोषणा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी येथे केली.

ठळक मुद्देमराठा महासंघाचे वसंत मुळीक कोल्हापूर ‘उत्तर’मधूननिवडणूक लढवण्याची घोषणा : काँग्रेसच्या उमेदवारीस प्राधान्य

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे मी समाजकारण करीत आहे, परंतु आता मी कोल्हापूर ‘उत्तर’विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते प्रचंड आग्रही आहेत. त्यांच्या दबावाचा आणि आग्रहाचा विचार करून मी निवडणुकीला सामोरा जाणार असल्याची घोषणा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी येथे केली.शाहू स्मारक भवन येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुळीक यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसला प्राधान्य देणार असल्याचेही स्पष्ट केले. मात्र तेथून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून उतरण्यासही मागे-पुढे पाहणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. मुळीक म्हणाले, सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेली तीस वर्षे मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजाचे संघटन करत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या चळवळीत महत्वाची भूमिका बजावली आहे. मराठा समाजाचे प्रश्र्न मांडतानाही सातत्याने इतर सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या बळावर निवडणूकीला सामोरे जावे असा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रथम काँग्रेसकडून तिकीट मागावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात आमचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर आपण अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.’बबन रानगे म्हणाले, गेली ३० वर्षे समाजकार्यात असलेला सामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकतो, हे आपण दाखवून दिले पाहिजे. ‘एक नोट - एक व्होट’ याप्रमाणे मुळीक यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे.इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘सरकारकडून सामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे. प्रतिगाम्यांचे विचार रोखायचे असतील तर मुळीक यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे.मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी म्हणाले, ‘आपल्या समाजकार्यातून वसंतराव हे सर्व समाजांच्या तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. फक्त संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सुटत नाही, तर ते मार्गी लावण्यासाठी राजकारणात यावे लागते. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय सत्ताही महत्त्वाची आहे.’शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. उत्तम जाधव यांनी आभार मानले. यावेळी आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, ख्रिश्चन समाजाचे अनंत म्हाळुंगेकर, अनिल पाटील, अमरसिंह पाटील, छावा संघटनेचे किसन लोहार, उत्तम कांबळे, डॉ. संदीप पाटील, मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

 

टॅग्स :maratha mahasanghमराठा महासंघvidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर