शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

स्टार ८८४... खिशात मोबाईल स्मार्ट; पण कोणाचाच नंबर नाही पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:29 AM

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मोबाईल क्रांती झाल्याचा आपण डांगाेरा पिटत असलो तर त्याचे दुष्परिणामही गंभीर आहेत. ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मोबाईल क्रांती झाल्याचा आपण डांगाेरा पिटत असलो तर त्याचे दुष्परिणामही गंभीर आहेत. मोबाईलने माणसाची मेमरी घालविली असून आपला सोडून कुटुंबातील इतरांचा क्रमांकही आपणास लक्षात नसतो. स्वत:चे एकापेक्षा अधिक क्रमांक असले तरी तेही पाठ नसतात. जे मोबाईल वापरत नाहीत, त्यांची स्मरणशक्ती तुलनेत अधिक चांगली असल्याचे दिसते.

काळानुरूप मोबाईलचा वापर करणे गरजेचे बनले असले तरी माणूस खूप त्याच्या आहारी गेला आहे. मूळ काम करताना आणि झाल्यानंतरही त्याने स्वत:ला मोबाईलमध्ये गुंतवून घेतल्याने त्याचा परिणाम माणसाच्या स्मरणशक्तीवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

असे का होते?

एखाद्या वस्तूचा वापर आपण कसा व किती वेळा करतो, त्यावर त्याचा टिकाऊपणा अवलंबून असतो. त्याप्रमाणे माणसाच्या मेंदूचेही आहे. ज्यांचे काम आयुष्यभर चाकोरेबद्ध राहिले आहे व नवीन काहीच करण्याचा प्रयत्न नसतो, अशा माणसांना विस्मृतीचा त्रास लवकर सुरू होतो. त्यात वय वाढेल तशी विस्मृतीचे प्रमाण वाढत जाते. आपले काम संपले की लगेच मोबाईलमध्ये डोके खुपसून बसतो. मोबाईलमध्येही आपल्या बुद्धीला चालना मिळेल असे नवीन काही करत नाही. जे आहे ते पाहत बसणे, एवढेच करत असतो.

हे टाळण्यासाठी काय करावे ?

मानवी मेंदू हा इतरांच्या तुलनेत वेगवान असतो. त्याला नेहमी नवनवीन काम दिले की तो त्याची गती कायम राहते. आपले नियमित कामाबरोबरच इतर छंद जोपासणे गरजेचे आहे. मोकळ्या वेळेतील जास्तीत जास्त काळ हा मेंदूला चालना देणारे काम केले तर, विस्मृतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

नातवापेक्षा अजोबाची स्मरणशक्ती अधिक

घरातील वयोवृद्ध मंडळी ७०-८० वर्षांच्या पूर्वीच्या आठवणी जशा आहेत तशा सांगतात. त्या उलट कुटुंबातील तरुणांची अवस्था आहे. रात्री झोपताना पैशाचे पाकीट कोठे ठेवले, हे दुसऱ्या दिवशी आठवत नाही.

पूर्वीच्या काळी आपल्या नियमित कामाशिवाय खूप वेळ मिळायचा, आता नवतंत्रज्ञानाच्या नावाखाली सगळेजण मोबाईलमध्ये अडकून पडल्याने कुटुंबातील संवाद कमी झाला आहे. तेच तेच चाकोरेबद्ध कामामुळे मेंदूची क्षमताही काहीसी कमी होते. यासाठी मेंदूला चालना देण्यासाठी नवनवीन काहीतरी करण्याच्या मागे लागले पाहिजे.

- डॉ. पवन खोत, मानसोपचारतज्ज्ञ

मी मोबाईल फार कमी वापरतो, सतत वेगळ्या कामात गुंतवून घेतल्याने वयाच्या ६६ व्या वर्षीही मला अनेक गोष्टींचे चटकन् स्मरण होते. कुटुंबातील प्रत्येकाने मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. अन्यथा आणखी काही वर्षांनी माणूस स्वत:लाच विसरून जाण्याची भीती आहे.

- नामदेव कांबळे, सोनाळी, ता. करवीर