शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

युवा संघर्ष संदेश जथ्थ्यास प्रारंभ

By admin | Published: October 04, 2015 11:23 PM

मान्यवरांची उपस्थिती : धर्मांध शक्तींविरोधात लढा देण्यासाठी सज्ज व्हा : भगवान

कोल्हापूर : अवैज्ञानिक मागास विचारांचा प्रसार करून, धर्माधर्मांत तेढ निर्माण करून जातिव्यवस्था बळकट करण्याचे काम सध्या सुरू आहे. समाजाला आधुनिकपूर्व काळाकडे मागे खेचण्याचे कटकारस्थान यशस्वी होऊ नये म्हणून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने जागृत होण्याची वेळ आली आहे. यासाठी एकत्र येऊन या धर्मांध शक्तींविरोधात लढा देण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन कर्नाटकातील ज्येष्ठ विचारंवत के. एस. भगवान यांनी केले. शाहू स्मारक भवन येथे डेमोक्रॅटिक यूथ फेडरशेन आॅफ इंडिया (डीवायएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीतर्फे आयोजित युवा संघर्ष संदेश जथ्थ्याच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते शरद भुताडिया होते. भगवान म्हणाले, गौतम बुद्धांचा इतिहास पाहिला असता त्यांनी सर्वप्रथम वर्ण व जातिव्यवस्था नाकारली. बुद्धांची राजवट होती तेव्हा कधीच परकियांचे आक्रमण झाले नव्हते; परंतु जेव्हा जातिव्यवस्था निर्माण झाली तेव्हा २६ वेळेला परकियांनी आपल्यावर आक्रमणे केली. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही जातिव्यवस्था कमी करण्यासाठी काम केले. पुढे नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांनी इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांचा सामना करून खरा इतिहास समाजापुढे आणला. ज्यांना जात, धर्म, लिंग यांत समान अधिकार असलेले आधुनिक राष्ट्र म्हणून आपला समाज पुढे जाणे पटत नाही, त्यांनीच यांची हत्या केली. मात्र, या धर्मांध शक्तींच्या दहशतवादासमोर महाराष्ट्रातील युवा पिढी झुकणार नाही. जातीनिहाय धर्मनिरपेक्ष देश करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. भगवान यांचे संपूर्ण भाषण इंग्रजीमध्ये झाले. यावेळी उदय नारकर यांनी त्याचे भाषांतर करून सांगितले. याप्रसंगी कोल्हापूरचे अध्यक्ष शिवाजी मगदूम यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष अजय बुरांडे, राज्य सेक्रेटरी प्रीती शेखर, राज्य सेक्रेटरी प्रशांत मायकेल, जिल्हा सेक्रेटरी शिवाजी बंदारे, दिलीप पोवार, चंद्रकांत यादव, शिवाजी शिंदे, दत्ता चव्हाण, कृष्णात कुलकर्णी, शिवाजी बोंद्रे, सदा मलाबादे, नितीन निपाणी, गणेश पुरवाते, आदी उपस्थित होते. रविवारी सकाळी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ येथून शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जथ्थ्याची सुरुवात झाली. पुढे गंगाराम कांबळे स्मृतिस्तंभास अभिवादन करून शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवाजी पुतळा, जुना राजवाडा, बिंदू चौक, उमा टॉकीज, गोखले कॉलेज, यादवनगर, शास्त्रीनगर या मार्गावरून जथ्था गोविंद पानसरे यांची ज्या ठिकाणी हत्या झाली तेथे येऊन पानसरे यांना अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी रघू कांबळे, अनिल चव्हाण, एस. बी. पाटील यांनी जथ्थ्याचे स्वागत केले. याप्रसंगी उमा पानसरे, मेघा पानसरे, सुभाष वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे हा जथ्था राजारामपुरी मारुती मंदिर, जनता बझार, उमा टॉकीज या मार्गे, शाहू स्मारक भवन येथे जथ्था आला. या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सायंकाळी जथ्था इचलकरंजीकडे रवाना झाला. पुढे पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, जळगाव, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यांत जथ्था फिरून ९ आॅक्टोबरला औरंगाबाद येथे होणाऱ्या अधिवेशनामध्ये कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)जथ्था रवानाडॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे तसेच प्रा. कलबुर्गी यांच्या तेजस्वी हौतात्म्याचा हाच संदेश घेऊन डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन आॅफ इंडिया दोन युवा संघर्ष जथ्थे रविवारी काढण्यात आली. पुण्यामध्ये डॉ. दाभोलकर यांना ज्या ठिकाणाहून आणि कोल्हापुरामध्ये पानसरे यांच्यावर ज्या ठिकाणी गोळ्या घालून जीवघेणा हल्ला झाला त्या ठिकाणाहून हा जथ्था काढण्यात आला.