शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

राज्य बँकेने विकास संस्थांना थेट कर्ज पुरवठा करावा

By admin | Published: January 02, 2017 1:07 AM

सुभाष देशमुख : राज्य बॅँकेच्या कोल्हापूर शाखेचे उद्घाटन

कोल्हापूर : जिल्हा बँका राजकीय गटा-तटांत अडकल्या असून, विकास संस्थांचे भागभांडवल बँकेकडे घेऊन त्यावर अल्पदराने थेट विकास संस्थांना कर्जपुरवठा करावा, अशी सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केली.दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या कोल्हापूर शाखेचे उद्घाटन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. चुकीच्या गोेष्टींमुळे सहकारावरील विश्वास कमी झाला आहे. आगामी काळात हा विश्वास वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत मंत्री देशमुख पुढे म्हणाले, विकास संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जिल्हा बँका गटा-तटात अडकल्याने विकास संस्थांना पर्यायाने शेतकऱ्यांना राज्य बँक चांगला पर्याय आहे. सहकारात निकोप स्पर्धा झाली पाहिजे. राज्य बँक ग्रामीण भागात येत असल्याने विकास संस्थांना आधार मिळणार आहे. बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ, जिल्हा बॅँकेचे राजकारण सांभाळण्यासाठीच विकास संस्था, या उद्देशामुळेच संस्था अडचणीत आल्या. हे बदलायचे आहे, राज्य बँकेने विकास संस्थांना मजबूत करण्याचा आराखडा तयार करण्याची सूचना मंत्री देशमुख यांनी केली. ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी बँकेचा इतिहास पॉवर पॉर्इंटच्या माध्यमातून सादरीकरण केले. खासदार धनंजय महाडिक, ए. ए. मगदूम, विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक एन. एन. जाधव, एस. बी. शेळके, शाखा व्यवस्थापक प्रमोद कांबळे यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय मंडळाचे सदस्य के. एन. तांबे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)विस्तार करा पण जपून!आर्थिक अरिष्टात सापडलेल्या राज्य बॅँकेला बाहेर काढण्याची जबाबदारी दीड वर्षांपूर्वी प्रशासकीय मंडळाकडे दिली. त्यांनी उत्तम काम करत बॅँकेला प्रगतिपथावर आणली. शाखाविस्तार करून व्यवसाय वाढवा, प्रगतीचा आलेख चढता ठेवा, भविष्यात अडचणी आल्या तर हा आलेख स्थिर राहावा पण त्यापेक्षा खाली येऊ नये, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.शेतीपूरक व्यवसायाला बळ द्या : चंद्रकांतदादाराज्य बॅँकेने केवळ गृह व वाहन कर्जांत अडकून न पडता शेतीपूरक व्यवसायांना कर्जपुरवठा करून तो बळकट करावा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम होण्यासाठी राज्य बँकेने शेतकरी केंद्रबिंदू मानून वाटचाल करावी, असेही ते म्हणाले. शेतीवर आधारित साखर उद्योग व ‘गोकुळ’सारख्या प्रक्रिया उद्योगामुळे कोल्हापुरात आर्थिक सुबत्ता आली. शेतकऱ्यांनी ‘पीक पॅटर्न’ बदलणे गरजेचे आहे. कच्चा माल जागेवरच खरेदी होतो, हा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण व्हावा, याकरिता प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीसाठी राज्य बॅँकेनेच आराखडा तयार करून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणालजिल्हा बँकेची शंभर कोटींची ठेव : जिल्हा बँकेने शंभर कोटींच्या ठेवी राज्य बँकेत जमा केल्या. मंत्री चंद्रकांतदादा पाटील व सुभाष देशमुख यांच्या हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांना ठेव पावती देण्यात आली. त्याचबरोबर पहिल्या २५ लाखांच्या गृहकर्ज धनादेशाचे वितरणही यावेळी करण्यात आले. े.