शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

आजरा साखर कारखान्याच्या हंगामाआधी राजकीय गुऱ्हाळ

By admin | Published: July 28, 2016 12:18 AM

या सभेकडेच विरोधी दहा संचालकांनी पाठ फिरवित आपला रोष कायम असल्याचे दाखवून दिले.

ज्योतीप्रसाद सावंत -आजरा --साखर कारखाना निवडणूक होऊन पहिला गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच सत्तारूढ आघाडी व विरोधकांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केली असून, यामुळे सभासदांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कारखान्याचे कारभारीच अशा पद्धतीने वागू लागले तर कारखन्याचे भवितव्य काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आजरा साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. महाआघाडीने काठावरचे बहुमत मिळवित सत्तेची सूत्रे स्वत:कडे ठेवण्यात यश मिळविले.अध्यक्ष निवडीपासूनच सध्याचे सत्तारूढ व विरोधक यांच्यात अंतर्गत वाद सुरू झाले. साखर वाटप करण्यास सरुवात करून महाआघाडीने आचारसंहितेचा भंग केल्याचा बॉम्ब विरोधकांनी टाकला. पाठोपाठ निवडणूक प्रक्रियेचा निकाल सदोष असल्याचे सांगता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या तज्ज्ञ संचालक नियुक्तीवेळी या सभेकडेच विरोधी दहा संचालकांनी पाठ फिरवित आपला रोष कायम असल्याचे दाखवून दिले. हीच संधी सत्ताधाऱ्यांना सापडल्याने सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना राजकारणाचे जोडे आता बाजूला ठेवा, असे सांगत निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या सर्व प्रकारात सभासदावर मात्र आता डोक्यावर होत मारून घेण्याची वेळ आली आहे. मुळातच यावर्षी ऊस क्षेत्रात घट झाली आहे.राजकीय साठमारी अशीच चालू राहिल्यास कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेजारील कारखान्यांसमोर ऊस टंचाईचा प्रश्न असल्याने उसाची पळवापळव होणार हेसुद्धा स्पष्ट आहे. आजरा साखर कारखान्यात डिस्टीलरी, सहवीज प्रकल्प सुरू करण्याशिवाय पर्यायही नाही सभासदांनी लोकशाही पद्धतीने सर्वच संचालकांना विश्वास म्हणून पाठविले आहे. अशावेळी संचालक मंडळातील अंतर्गत वाद आता तरी परवडणारे नाहीत हे नक्की.राजकारणामुळे नुकसानराजकीय साठमारी अशीच चालू राहिल्यास केवळ राजकारणामुळे काही ऊस बाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेजारील कारखान्यांसमोर ऊस टंचाईचा प्रश्न असल्याने उसाची पळवापळव होणार हेसुद्धा स्पष्ट आहे.आजरा साखर कारखान्यात डिस्टिलरी, सहवीज प्रकल्प सुरू करण्याशिवाय पर्यायही नाही. सभासदांनी लोकशाही पद्धतीने सर्वच संचालकांना विश्वास म्हणून पाठविले आहे. अशावेळी संचालक मंडळातील अंतर्गत वाद आता तरी परवडणारे नाहीत हे नक्की.