शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

नरके चुलत्या-पुतण्यांत अंतर्गत राजकीय समझोता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:37 AM

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके या चुलत्या-पुतण्यांमध्ये कमालीचा राजकीय समझोता आहे. लोकसभा निवडणुकीत ...

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके या चुलत्या-पुतण्यांमध्ये कमालीचा राजकीय समझोता आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांची स्वतंत्र भूमिका असली, तरी त्याला विधानसभा व ‘गोकुळ’च्या राजकारणाची किनार आहे; पण आगामी विधानसभा निवडणुकीत ते एकत्रितच काम करणार हे निश्चित आहे.डी. सी. नरके यांनी ‘कुंभी’ सोडून इतर राजकारणात कधीच हस्तक्षेप केला नव्हता. अरुण नरके यांनी ‘गोकुळ’, जिल्हा बॅँकेसह जिल्हास्तरावरील राजकारण सांभाळले. डी. सी. नरके यांच्या पश्चातही आमदार चंद्रदीप नरके व अरुण नरके यांनी समझोत्यानुसारच राजकारणाची दिशा ठरविली. विधानसभा व साखर कारखाना आमदार नरके यांच्या, तर ‘गोकुळ’सह इतर राजकारण अरुण नरके यांच्यासोबत राहायचे, असा अलिखित समझोता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत संदीप नरके यांनी कॉँग्रेसच्या वतीने कळे जि.प.तून निवडणूक लढविल्यानंतर नरके कुटुंबात थोडा तणाव निर्माण झाला होता.गत लोकसभा निवडणुकीत आमदार नरके हे मंडलिक यांच्यासोबत, तर अरुण नरके हे महाडिक यांच्या पाठीशी होते. त्यावेळी ‘करवीर’मधून महाडिक यांना ३४ हजारांचे मताधिक्य मिळाले व तेच मंडलिकांच्या पराभवास कारणीभूत ठरले. त्याची झळ आमदार नरके यांना सोसावी लागली. त्यात ‘गोकुळ’च्या राजकारणात महाडिक, पी. एन. पाटील एकत्र आहेत. विधानसभेला ‘गोकुळ’च्या यंत्रणेचा आमदार नरके यांना त्रास होत असल्याने त्यांनी टार्गेट केले आहे. अरुण नरके हे सत्तारूढ गटाबरोबर असतानाही आमदार नरके यांनी ‘गोकुळ’च्या सभेत आक्रमक भूमिका घेतली. त्या रागापोटी महादेवराव महाडिक यांनी नरकेंना विधानसभेला पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा केली; त्यामुळे नरके अधिक आक्रमक झाले आहेत.आमदार नरके यांच्यादृष्टीने विधानसभा महत्त्वाची आहे, आता आक्रमकपणे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचले तर त्याचा फायदा पुढे होऊ शकतो. मंडलिक यांना मताधिक्य देऊन ‘मातोश्री’वर वजन वाढविता येणार आहे. अरुण नरके व महादेवराव महाडिक यांची जुनी दोस्ती आहे. ‘गोकुळ’ राजकारणात महाडिक यांच्यासोबत, तर विधानसभेला आमदार नरके यांनाच साथ देणार हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केल्याने त्यांच्यात संघर्ष उफाळण्याची शक्यता कमी आहे.हात धरायचा नाही...!अरुण नरके यांनी मेळावा घेऊन महाडिक यांच्यामागे ताकद लावल्याने नरके गटात फूट पडल्याची चर्चा सुरू आहे; पण जिल्ह्यात कोणत्याच कुटुंबाअंतर्गत समझोता नसेल इतका नरके कुटुंबात आहे. कोणी कोठे थांबायचे आणि कोणाला कशी चाल द्यायची, याबाबत त्यांचा कोणी हात धरायचा नाही.