शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

अद्याप २० हजार टन ऊस शिवारात उभा

By admin | Published: February 01, 2015 9:39 PM

पेरणोलीत उसाची उचल कधी? : पाच-सहा वर्षांत सातत्याने या विभागावर अन्याय

कृष्णा सावंत - पेरणोली -फेब्रुवारी चालू झाला तरी अद्याप निम्म्यावर उसाची उचल न झाल्याने पेरणोली (ता. आजरा) येथील परिसरातील उसाची उचल कधी होणार, अशी विचारणा शेतकऱ्यांमधून होत आहे.पेरणोलीसह साळगाव, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, कुरकुंदे, आदी गावांत उसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आजरा तालुका हा मुबलक प्रमाणात असलेला उसाचा मोठा पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांत सातत्याने या विभागावर उचलीच्या संदर्भात अन्याय होत आहे.आजरा कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण करण्यासाठी व गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अन्य तालुक्यात टोळ्या असल्या, तरी तालुक्यातील ज्या भागात उसाचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात टोळ्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. मात्र, तसे न होता ज्या कारखाना सेंटरमध्ये उसाचे प्रमाण कमी आहे, त्या सेंटरपेक्षा जास्त ऊस उपलब्ध असलेल्या सेंटरमध्ये टोळ्यांचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.सुलगावमध्ये १५०० टन, तर आजऱ्यात ३ ते ४ हजार टन ऊस आहे. मात्र, या दोन्ही गावांत एकूण सहा टोळ्या कार्यरत आहेत. पेरणोली सेंटरला २३ हजार टनांपेक्षा अधिक ऊस उपलब्ध असताना केवळ सहाच टोळ्या आहेत. त्यात पेरणोलीमध्ये तीन व साळगावात तीन टोळ्या आहेत. कोरीवडे, देवकांडगाव, हरपवडे, कुरकुंदे या ऊस उपलब्ध असलेल्या ठिकाणी एकही टोळी नसल्याने कारखान्याच्या प्रशासनाविषयी नाराजी व्यक्तकरण्यात येत आहे.ज्यांचा ऊस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गेला आहे, त्यांची जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तोडीची नोंद पेरणोली सेंटरमध्ये आहे. त्यामुळे क्रमपाळीत गोंधळ झाला आहे.ज्यांनी गेल्या पाच वर्षांत अन्य कारखान्यांना ऊस पाठविला आहे, अशा लोकांचा ऊस अगोदर जातो. ज्यांनी प्रामाणिकपणे दराचा विचार न करता आजरा कारखान्यालाच ऊस पाठविला, त्यांना क्रमपाळी दाखवली जाते. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे पेरणोलीसह कुरकुंदे, कोरीवडे, देवकांडगावात जादा टोळ्यांच्या मागणीचा जोर वाढत आहे.उसाची उपलब्धता लक्षात घेता टोळ्या वाढविण्यासाठी नियोजन सुरू आहे. एक ते दोन दिवसांत आणखी टोळ्या पाठवून देऊ.- विष्णुपंत केसरकर, अध्यक्ष, आजरा साखर कारखाना