शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
4
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
6
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
7
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
8
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
9
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
10
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
11
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
12
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
13
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
14
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
15
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
16
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
17
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
18
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
19
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
20
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

सरसकट कर्जमाफीसाठी वडणगे फाटा येथे रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 1:26 PM

कोल्हापूर : भाजप सरकार निवडणूकीत आश्वासनाचे गाजर दाखवून सत्तेवर आले, पण त्यांनी रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. कर्जमाफीमध्ये मखलाशी करून शेतकºयांना फसवले आहे, अशा सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा कॉ. अनिल चव्हाण यांनी दिला. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर वडणगे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे सुकाणू समिती कार्यकत्यांचा वडणगे फाटा येथे रस्ता रोको दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीतअर्धा तास कार्यकत्यांचा रस्त्यावर ठिय्यासरकारच्या निषेधासह आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजीशेतकºयांना फसवणाºया सरकारला धडा शिकवणार : अनिल चव्हाण

कोल्हापूर : भाजप सरकार निवडणूकीत आश्वासनाचे गाजर दाखवून सत्तेवर आले, पण त्यांनी रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. कर्जमाफीमध्ये मखलाशी करून शेतकºयांना फसवले आहे, अशा सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा कॉ. अनिल चव्हाण यांनी दिला.

शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर वडणगे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अर्धा तास कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. पोलीसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सरकारच्या निषेधासह सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना कॉ. अनिल चव्हाण यांनी सरकारवर सडकून टीका केली. भाजप सरकारला निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असून त्यांना जागे करण्यासाठी आक्रमक आंदोलन हाती घ्यावे लागणार आहे. याचा पहिला टप्पा म्हणून रस्ता रोको केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

निम्मा महाराष्टÑ दुष्काळात होरपळत आहे, शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, पण सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक दिसत नसल्याचे बी. एल. बरगे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एस. आर. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

पोलीसांनी हस्तक्षेप करत आंदोलन कर्त्यांना बाजूला केल्यानंतर वहातूक पुर्ववत सुरू झाली. यावेळी अ‍ॅड. अजित पाटील, आदम मुजावर, नारायण मोरे, विलास चौगले, भिकाजी पाटील, आंनदा तिटवे, उत्तम चौगुले, संपत दळवी, संग्राम मांगलेकर आदी उपस्थित होते.नोटाबंदीमुळे व्यवसाय संपले!

नोटाबंदीनंतर काळा पैसा बाहेर येईल, असे केंद्र सरकारने सामान्य माणसाला भासवले. नोटाबंदी नंतर शेतकºयांचे कंबरडे मोडलेच पण त्याचबरोबर व्यवसाय बंद झाल्याने बेरोजगारी वाढल्याचे चव्हाण यांनी सांगितले.