शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

दिवसा सेंट्रिंग, रात्री लूटमार, सहाजणांच्या लुटारू टोळीला अटक : दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 1:12 PM

दिवसा सेंट्रिंग काम आणि रात्री लूटमार करणाऱ्या जिल्ह्यातील सहाजणांच्या सराईत टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्या ताब्यातून कार, दुचाकी, ४५ मोबाईल हॅँडसेट, आठ तलवारी, रोख रक्कम असा सुमारे दहा लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. टोळीतील आणखी दोन साथीदार पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देदिवसा सेंट्रिंग, रात्री लूटमार, सहाजणांच्या लुटारू टोळीला अटक दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : दिवसा सेंट्रिंग काम आणि रात्री लूटमार करणाऱ्या जिल्ह्यातील सहाजणांच्या सराईत टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्या ताब्यातून कार, दुचाकी, ४५ मोबाईल हॅँडसेट, आठ तलवारी, रोख रक्कम असा सुमारे दहा लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. टोळीतील आणखी दोन साथीदार पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.संशयित म्होरक्या आशिष हणमंत गायकवाड (वय २३), राज अंजुम मुल्ला (१९), शंकर सुनील गायकवाड (१९, तिघे रा. राजेंद्रनगर), प्रकाश शांताराम कोकाटे (१९, मोतीनगर, कोल्हापूर), तुषार रवींद्र लोहार (२०, रा. चोकाक, ता. हातकणंगले), सुभाष विष्णू पाटील (२७, रा. अतिग्रे, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. त्यांचे आणखी दोन साथीदार पसार आहेत.शिरोली एम. आय. डी. सी. येथे २६ आॅक्टोबरला कारखान्यातून घरी जाणारा परप्रांतीय कामगार राजेशकुमार पाल याला सहाजणांच्या टोळीने रात्री साडेनऊच्या सुमारास रस्त्यात अडवून, तलवारीचा धाक दाखवून मोबाईल, चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला होता. हा गुन्हा राजारामपुरी येथील एका सक्रिय टोळीने केल्याची माहिती हवालदार संतोष माने यांना मिळाली होती.

ही टोळी कार (एमएच ०९ एस - ९५२२) मधून राजाराम तलाव परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार पथके रवाना करून सापळा लावला असता राजाराम तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूचुंबकत्व संस्थेसमोर कारमधून आलेल्या सहाजणांना पकडले.

कारची झडती घेतली असता त्यामध्ये आठ तलवारी, कापडात बांधलेले मोबाईल हॅँडसेटचे गाठोडे, पाकीट आढळून आले. पाच हजार ते चाळीस हजार किमतीचे मोबाईल गाठोड्यात दिसून आले. कामगार पाल यांचे आधारकार्डही आढळून आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता या टोळीचे म्होरके आशिष गायकवाड आणि प्रकाश कोकाटे असल्याचे निष्पन्न झाले.

दिवसभर सेंट्रिंग काम करायचे; त्यानंतर चोरून आणलेल्या कारमधून ते गोकुळ शिरगाव, शिरोली एम. आय. डी. सी. इचलकरंजी, शिवाजी विद्यापीठ परिसरातील परप्रांतीय कामगारांना तलवारीचा धाक दाखवून लूटमार करीत असत. आतापर्यंत त्यांची चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सर्वजण आठवीपर्यंत शाळा शिकले आहेत. आई-वडील मोजमजुरी करतात. चैनी, मौजमजा आणि झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी ते सेंट्रिंग कामानंतर रात्री लूटमार करीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.अंगाला हात लावायचा नाय!संशयित प्रकाश कोकाटे याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करते. हा टोळीचा म्होरक्या असल्याने पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर तो ‘अंगाला हात लावायचा नाय...!’ अशी पोलिसांनाच दमदाटी करू लागला. शरीराने सडपातळ असलेल्या या म्होरक्याला अजून मिसरूडही फुटलेली नाही. त्याच्या अंगातील गुन्हेगारीचा माज पोलिसांनी खाकी प्रसादाने उतरविला. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर