शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

विद्यार्थ्यांचा अकरावीसाठी शहराकडे ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओढा आहे. त्यात अधिकतर उपनगर आणि शहरालगतच्या दहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओढा आहे. त्यात अधिकतर उपनगर आणि शहरालगतच्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील गावांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरातील विविध ३५ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन केंद्रीय प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेची (सीईटी) प्रतीक्षा लागली आहे.

ग्रामीण भागातील गडहिंग्लज, कागल, राधानगरी, इचलकरंजी, वारणा आदी परिसरातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी हे त्यांच्या गावापासून जवळ असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशित होतात. मात्र, उपनगरे आणि शहरालगतच्या करवीर तालुक्यातील विविध गावांमधील विद्यार्थ्यांचा शहरातील महाविद्यालयांमधील प्रवेशाकडे ओढा आहे. गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणि विद्यार्थ्यांची धावपळ थांबविण्याच्या उद्देशाने शहरातील ३५ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू केली. गेल्या दोन वर्षांपासून ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. शहरातील अकरावीची प्रवेशक्षमता १४८६०, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १५० महाविद्यालये असून त्यांची प्रवेशक्षमता ३५ हजार इतकी आहे. पण, गेल्या पाच वर्षांपासून आयटीआयकडील विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने शहर आणि ग्रामीण भागातील अकरावीच्या ४० ते ६० टक्के जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहत नसल्याचे चित्र आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया शहरात ऑनलाईन तर ग्रामीण भागात ऑफलाईन पध्दतीने राबविली जाते. यावर्षीदेखील हीच पध्दत राहणार आहे. प्रवेश प्रक्रिया सीईटीच्या गुणांवर होणार असल्याने या परीक्षेची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.

पॉईंटर

शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये : ३५

एकूण जागा : १४८६०

गेल्यावर्षी किती अर्ज आले : १२९६१

किती जणांनी प्रवेश घेतला : ६८७३

किती जागा रिक्त राहिल्या : ७८०७

चौकट

शहरातील ४० टक्के जागा रिक्त

गेल्या तीन वर्षांपासून अकरावीसाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित होण्याकडील विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे दिसत आहे. साधारणत: ४० ते ५० टक्के जागा रिक्त राहत असल्याचे सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी सांगितले.

ऑनलाईन प्रवेश व्हावेत

प्रवेशाची प्रक्रिया गतीने होण्यासाठी ऑनलाईन पद्धत महत्त्वाची आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांप्रमाणे यावर्षीही शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने व्हावी.

-प्रभाकर हेरवाडे, सचिव, दि. न्यू एज्युकेशन सोसायटी.

शहरातील महाविद्यालयांच्यादृष्टीने अकरावीसाठी ऑनलाईन प्रक्रिया, तर ग्रामीण भागासाठी ऑफलाईन प्रक्रिया योग्य आहे. ती यापुढेही कायम राहावी.

-सी. एम. गायकवाड, आजीव सेवक, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग.