शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

‘स्वाभिमानी’ संघटना स्वबळावर लढणार

By admin | Updated: February 5, 2017 00:15 IST

भाजपशी फारकत : शिरोळमधील वाटाघाटीच केंद्रस्थानी

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील जागांबाबतच तडजोड न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय शनिवारी अधिकृतपणे जाहीर केला. हा निर्णय जाहीर करून संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातून प्रचाराचे रणशिंगही फुंकले. शिरोळ तालुक्यातील सात जागांवरच स्वाभिमानी व भाजपमध्ये मतैक्य न झाल्याने ही युती होऊ शकली नाही. आता त्याबाबत पुन्हा चर्चा व बैठका न घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.स्वाभिमानी संघटना स्वबळावरच लढणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’नेच सर्वप्रथम दिले होते; कारण भाजपने त्या पक्षाशी आघाडी करण्यासाठी चर्चाच केलेली नव्हती; परंतु जिल्हा परिषदेत सत्ता आणावयाची झाल्यास संघटना बाजूला जाऊन चालणार नाही, असे वाटल्यावर मग संघटनेशी बोलणी सुरू झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व खासदार शेट्टी यांच्यात शुक्रवारी (दि. ३) मॅरेथॉन चर्चा झाली; परंतु त्यातून तोडगा न निघाल्याने संघटनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.संघटनेने जिल्हा परिषदेच्या २२ व पंचायत समितीच्या ४४ जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यातील निम्मे उमेदवार जाहीर केले आहेत. आज, रविवारी उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.हा दांभिकपणा कशाला?बैठकीत पालकमंत्र्यांनी संघटनेपुढे मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवल्यावर खासदार शेट्टी यांनी त्यास कडाडून विरोध केला. हा दांभिकपणा आम्हाला जमणार नाही. लढायचे असेल आघाडी करून, नाहीतर स्वतंत्रपणे, असा पवित्रा त्यांनी घेतल्यावर चर्चाच थांबली. विठ्ठलराव नाईक-निंबाळकर हे फार जुने कार्यकर्ते आहेत; अशोकराव माने हे सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत, असे पालकमंत्री सांगत होते. त्यास ‘त्यांना तुम्ही पक्षात घेताना आम्हाला विचारून घेतले होते का?’ अशी विचारणा शेट्टी यांनी केली. ‘तुम्ही आयात केलेल्या माणसांसाठी आम्ही संघटनेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,’ असे शेट्टी यांनी सांगितले. संघटनेने कुणाशीच आघाडी करू नये असा कार्यकर्त्यांचा दबाव होता. कार्यकर्ता हीच माझी संपत्ती व ताकद आहे. त्यांच्या आग्रहाखातर स्वबळावर लढण्याचा निर्णय नाइलाजाने घ्यावा लागला. - खासदार राजू शेट्टी, संस्थापक-अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात जागा आहेत. हा तालुका संघटनेचा बालेकिल्ला आहे. आताही त्यांच्याकडे त्यातील आठपैकी पाच जागा आहेत व दत्तवाडमधून आदिनाथ हेमगिरे हे ४१ मतांनी पराभूत झाले होते. मात्र, भाजपने तिथे संघटनेला तीनच जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. २ नांदणीत राजवर्धन निंबाळकर व आलास मतदारसंघातून उल्फतबी मकानदारांना भाजपने आश्वासन दिल्याने तिथे भाजपला मैत्रीपूर्ण निवडणूक हवी होती व शिरोळला अशोकराव माने व अब्दुललाटमधून विजय भोजे यांच्यासाठी हे मतदारसंघ भाजपला हवे होते. ३ दानोळी, दत्तवाड व उदगाव येथे भाजप हा शिवसेनेशी छुपी युती करून आपल्याला अडचणीत आणण्याची खेळी करीत असल्याचा स्वाभिमानीला संशय होता. संघटनेशी युती तुटल्यावर लगेचच शनिवारी भाजप व शिवसेनेची युती झाली, हा त्याचा पुरावाच असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे तीन जागांसाठी भाजपशी आघाडी करण्याची गरजच काय, असा विचार करून संघटनेने वेगळी वाट शोधली.