शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

एकरकमी एफआरपीसाठी २२ मार्चला स्वाभिमानीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:21 AM

जयसिंगपूर : राज्यात अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी थकीत ठेवलेली आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याच साखर कारखान्याने एफआरपीची मोडतोड केली ...

जयसिंगपूर : राज्यात अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी थकीत ठेवलेली आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याच साखर कारखान्याने एफआरपीची मोडतोड केली आहे. २२ मार्चच्या आत राज्यातील साखर कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी जमा करावी, अन्यथा सहकारमंत्र्यांच्या कराड येथील सह्याद्री साखर कारखान्यासमोर असलेल्या स्व. पी. डी. पाटील यांच्या पुतळ्यासमोरच बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.

यंदाच्या गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला राज्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी, यासाठी स्वाभिमानीने आग्रही भूमिका घेतली होती. स्वाभिमानीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलेली आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी देण्याची हमी दिली होती. मात्र काही साखर कारखान्यांनी आपला शब्द फिरविला. तीन ते चार कारखाने वगळता उर्वरित साखर कारखान्यांनी २५०० रुपयेच पहिली उचल जमा केली. तसेच सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची मोडतोड केली आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांकडे आम्ही तक्रार दाखल केली.

राज्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपी मिळवून देणे हे सहकारमंत्र्यांचे कर्तव्य आहे. सहकारमंत्रीच जर कायदे मोडत असतील तर मग शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा, सहकारमंत्र्यांना सुबुद्धी यावी, तसेच राज्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी, यासाठी स्वाभिमानीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.