शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
3
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
4
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
5
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
6
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
8
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
9
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
10
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
11
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
12
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
13
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
14
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
15
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
16
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
17
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
18
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
19
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

मीनाकुमारी युगाचा सुगंध दरवळला

By admin | Published: April 02, 2016 12:20 AM

‘एक थी पाकिजा...’ : ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’तर्फे आयोजन; अलोट गर्दी

कोल्हापूर : ‘चलते चलते, यूॅँही कोई मिल गया था...’, ‘अजीब दास्तॉँ है ये, कहॉँ शुरू कहॉँ खतम...’ ‘चलो दिलदार चलो, चॉँद के पार चलो..’ यासारख्या विविध सदाबहार गीत-संगीताच्या सादरीकरणाद्वारे मीनाकुमारी युगाचा सुगंध गुरुवारी (दि. ३१) पुन्हा दरवळला. निमित्त होते, कसदार अभिनयाने अजरामर झालेल्या आणि शायरीमुळे रसिकांच्या मनात स्थान मिळविलेल्या मीनाकुमारी यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘एक थी पाकिजा...’ कार्यक्रमाचे!केशवराव भोसले नाट्यगृहात ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’ या हौशी सांस्कृतिक व्यासपीठातर्फे आयोजित कार्यक्रमाचे उपमहापौैर शमा मुल्ला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, ‘हृदयस्पर्श’चे पद्माकर कापसे, पद्मिनी कापसे, दिलीप लडगे, वैशाली क्षीरसागर, डॉ. चंद्रकांत मिठारी, पंडित कंदले, किसन कल्याणकर, आदी उपस्थित होते. ट्रॅजेडी क्वीन, अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारी यांची शोकात्मक चरित्रगाथा आणि रूपेरी प्रवास दृक्-श्राव्य, निवेदन व थेट गाण्यांच्या कार्यक्रमातून चाहत्यांनी अनुभवला. यामध्ये सात गाणी थेट सादरीकरणाद्वारे, तर बारा गाणी मूळ स्वरूपात पडद्यावर दाखविण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभासंपन्न अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या चित्रपट प्रवासावर आधारित, बचपन की मुहब्बत को दिलसे है जुदा करना, रुक जा बीते ना मिलन की बेला, दिल जो न कह सका, इन्ही लोगों ने... इन्ही लोगों ने ले लिना दुपट्टा मेरा... या गीतांनी उपस्थितांना भूतकाळाची सफर घडविली. कृष्णधवलातील मूळ स्वरूपात दाखविण्यात आलेल्या ज्योती कलश झलके, मौसम है आशिकाना, हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, न जाओ सैय्या छुडाके बैय्या... या गाण्यांनी चाहत्यांची वाहवा मिळविली. मीनाकुमारी यांच्या आयुष्यातील माईलस्टोन ठरलेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील ‘मोहे भूल गये सावरियॉँ...’, ‘छू लेने दो नाजूक होंटो को... ’, ‘आज हम दुवाओं का असर देखेंगे...’ यासारख्या गीतांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. मीनाकुमारी यांच्या काही गीतांचे कीर्ती सुतार यांनी आपल्या सुरेल आवाजात सादरीकरण केले. त्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रथितयश गायक प्रल्हाद पाटील यांनी भावोत्कट निवेदनातून मीनाकुमारीचे जीवनचित्र उभे केले. विक्रांत पाटील यांनी त्यांना पार्श्वसंगीत साथ दिली. मंदार पाटील यांनी संकलन केले. स्क्रीन सादरीकरण सज्जन लोहार यांनी केले. चित्रफीत संकलन ‘मल्टिमिक्स सिस्टीम’चे मंदार पेटकर यांनी पाहिले. कार्यक्रमाची संकल्पना-संहिता पद्माकर कापसे यांनी, तर निर्मिती पद्मिनी कापसे यांची होती. मनोजकुमार यांचे अभिनंदन ‘भारतकुमार’ अशी उपाधी असणारे कलाकार मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून ‘हृदयस्पर्श’तर्फे लवकरच त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मीनाकुमारी युगाचा सुगंध दरवळला‘एक थी पाकिजा...’ : ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’तर्फे आयोजन; अलोट गर्दीकोल्हापूर : ‘चलते चलते, यूॅँही कोई मिल गया था...’, ‘अजीब दास्तॉँ है ये, कहॉँ शुरू कहॉँ खतम...’ ‘चलो दिलदार चलो, चॉँद के पार चलो..’ यासारख्या विविध सदाबहार गीत-संगीताच्या सादरीकरणाद्वारे मीनाकुमारी युगाचा सुगंध गुरुवारी (दि. ३१) पुन्हा दरवळला. निमित्त होते, कसदार अभिनयाने अजरामर झालेल्या आणि शायरीमुळे रसिकांच्या मनात स्थान मिळविलेल्या मीनाकुमारी यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘एक थी पाकिजा...’ कार्यक्रमाचे!केशवराव भोसले नाट्यगृहात ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’ या हौशी सांस्कृतिक व्यासपीठातर्फे आयोजित कार्यक्रमाचे उपमहापौैर शमा मुल्ला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, ‘हृदयस्पर्श’चे पद्माकर कापसे, पद्मिनी कापसे, दिलीप लडगे, वैशाली क्षीरसागर, डॉ. चंद्रकांत मिठारी, पंडित कंदले, किसन कल्याणकर, आदी उपस्थित होते. ट्रॅजेडी क्वीन, अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारी यांची शोकात्मक चरित्रगाथा आणि रूपेरी प्रवास दृक्-श्राव्य, निवेदन व थेट गाण्यांच्या कार्यक्रमातून चाहत्यांनी अनुभवला. यामध्ये सात गाणी थेट सादरीकरणाद्वारे, तर बारा गाणी मूळ स्वरूपात पडद्यावर दाखविण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभासंपन्न अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या चित्रपट प्रवासावर आधारित, बचपन की मुहब्बत को दिलसे है जुदा करना, रुक जा बीते ना मिलन की बेला, दिल जो न कह सका, इन्ही लोगों ने... इन्ही लोगों ने ले लिना दुपट्टा मेरा... या गीतांनी उपस्थितांना भूतकाळाची सफर घडविली. कृष्णधवलातील मूळ स्वरूपात दाखविण्यात आलेल्या ज्योती कलश झलके, मौसम है आशिकाना, हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, न जाओ सैय्या छुडाके बैय्या... या गाण्यांनी चाहत्यांची वाहवा मिळविली. मीनाकुमारी यांच्या आयुष्यातील माईलस्टोन ठरलेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील ‘मोहे भूल गये सावरियॉँ...’, ‘छू लेने दो नाजूक होंटो को... ’, ‘आज हम दुवाओं का असर देखेंगे...’ यासारख्या गीतांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. मीनाकुमारी यांच्या काही गीतांचे कीर्ती सुतार यांनी आपल्या सुरेल आवाजात सादरीकरण केले. त्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रथितयश गायक प्रल्हाद पाटील यांनी भावोत्कट निवेदनातून मीनाकुमारीचे जीवनचित्र उभे केले. विक्रांत पाटील यांनी त्यांना पार्श्वसंगीत साथ दिली. मंदार पाटील यांनी संकलन केले. स्क्रीन सादरीकरण सज्जन लोहार यांनी केले. चित्रफीत संकलन ‘मल्टिमिक्स सिस्टीम’चे मंदार पेटकर यांनी पाहिले. कार्यक्रमाची संकल्पना-संहिता पद्माकर कापसे यांनी, तर निर्मिती पद्मिनी कापसे यांची होती. मनोजकुमार यांचे अभिनंदन ‘भारतकुमार’ अशी उपाधी असणारे कलाकार मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून ‘हृदयस्पर्श’तर्फे लवकरच त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मीनाकुमारी युगाचा सुगंध दरवळला‘एक थी पाकिजा...’ : ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’तर्फे आयोजन; अलोट गर्दीकोल्हापूर : ‘चलते चलते, यूॅँही कोई मिल गया था...’, ‘अजीब दास्तॉँ है ये, कहॉँ शुरू कहॉँ खतम...’ ‘चलो दिलदार चलो, चॉँद के पार चलो..’ यासारख्या विविध सदाबहार गीत-संगीताच्या सादरीकरणाद्वारे मीनाकुमारी युगाचा सुगंध गुरुवारी (दि. ३१) पुन्हा दरवळला. निमित्त होते, कसदार अभिनयाने अजरामर झालेल्या आणि शायरीमुळे रसिकांच्या मनात स्थान मिळविलेल्या मीनाकुमारी यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘एक थी पाकिजा...’ कार्यक्रमाचे!केशवराव भोसले नाट्यगृहात ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’ या हौशी सांस्कृतिक व्यासपीठातर्फे आयोजित कार्यक्रमाचे उपमहापौैर शमा मुल्ला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, ‘हृदयस्पर्श’चे पद्माकर कापसे, पद्मिनी कापसे, दिलीप लडगे, वैशाली क्षीरसागर, डॉ. चंद्रकांत मिठारी, पंडित कंदले, किसन कल्याणकर, आदी उपस्थित होते. ट्रॅजेडी क्वीन, अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारी यांची शोकात्मक चरित्रगाथा आणि रूपेरी प्रवास दृक्-श्राव्य, निवेदन व थेट गाण्यांच्या कार्यक्रमातून चाहत्यांनी अनुभवला. यामध्ये सात गाणी थेट सादरीकरणाद्वारे, तर बारा गाणी मूळ स्वरूपात पडद्यावर दाखविण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभासंपन्न अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या चित्रपट प्रवासावर आधारित, बचपन की मुहब्बत को दिलसे है जुदा करना, रुक जा बीते ना मिलन की बेला, दिल जो न कह सका, इन्ही लोगों ने... इन्ही लोगों ने ले लिना दुपट्टा मेरा... या गीतांनी उपस्थितांना भूतकाळाची सफर घडविली. कृष्णधवलातील मूळ स्वरूपात दाखविण्यात आलेल्या ज्योती कलश झलके, मौसम है आशिकाना, हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, न जाओ सैय्या छुडाके बैय्या... या गाण्यांनी चाहत्यांची वाहवा मिळविली. मीनाकुमारी यांच्या आयुष्यातील माईलस्टोन ठरलेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील ‘मोहे भूल गये सावरियॉँ...’, ‘छू लेने दो नाजूक होंटो को... ’, ‘आज हम दुवाओं का असर देखेंगे...’ यासारख्या गीतांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. मीनाकुमारी यांच्या काही गीतांचे कीर्ती सुतार यांनी आपल्या सुरेल आवाजात सादरीकरण केले. त्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रथितयश गायक प्रल्हाद पाटील यांनी भावोत्कट निवेदनातून मीनाकुमारीचे जीवनचित्र उभे केले. विक्रांत पाटील यांनी त्यांना पार्श्वसंगीत साथ दिली. मंदार पाटील यांनी संकलन केले. स्क्रीन सादरीकरण सज्जन लोहार यांनी केले. चित्रफीत संकलन ‘मल्टिमिक्स सिस्टीम’चे मंदार पेटकर यांनी पाहिले. कार्यक्रमाची संकल्पना-संहिता पद्माकर कापसे यांनी, तर निर्मिती पद्मिनी कापसे यांची होती. मनोजकुमार यांचे अभिनंदन ‘भारतकुमार’ अशी उपाधी असणारे कलाकार मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून ‘हृदयस्पर्श’तर्फे लवकरच त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.