शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णात वाढ, दोन महिन्यात १३ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 14:49 IST

व्हायरल इन्फेक्शनमुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाईन फ्लूचे प्रमाण वाढले असून यामध्ये १३ जणांचा बळी गेला आहे. सध्या ९ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, १६ जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. एकूण ११३ जणांना या आजाराची लागण झाली आहे.गेल्या दोन महिन्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. काेरोनानंतर एकूणच सर्दी, ताप, खोकला सुरू झाल्यानंतर नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असताना अनेकदा ताप अंगावर काढण्याची वृत्ती वाढत आहे. थोडा ताप कमी आला की गोळ्या बंद केल्या जातात. मग पुन्हा ताप येतो. पुन्हा चाचण्या केल्या जातात. अशातच जुना काही आजार असेल तर आरोग्यस्थिती आणखी बिघडते. त्यामुळेच स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत जिल्ह्यात वाढ होत आहे.सध्या ४४ जणांवर उपचारसध्या कोल्हापूर जिल्ह्यात ४४ जण रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये ७० पुरुष आणि ४४ महिलांचा समावेश आहे. ३१ ते ७० वयोगटातील रुग्णांची संख्या यामध्ये अधिक असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळेच ९ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून १८ जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.वयोगटानुसार रुग्णसंख्या१ ते १० - ०५११ ते २० - ०४२१ ते ३० - १३३१ ते ४० - २२४१ ते ५० - १२५१ ते ६० - २९६१ ते ७० - २३७१ ते ८० - ०५८१ ते ९० - ०१एकूण ११४

जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले असून त्यामुळे स्वाईन फ्लूचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी अंगावर ताप काढू नये. ताप कमी आला म्हणून डोस बंद करू नये. तो पूर्ण करावा. वैद्यकीय सल्ला घ्यावा. ताप आल्यास शक्यतो इतरांशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न करावा. - डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwine Flueस्वाईन फ्लू