शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

जलयुक्त शिवारसाठी तालुकास्तरीय समिती

By admin | Published: April 13, 2016 12:11 AM

‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ : राज्य शासनाचा २०१९ पर्यंत पाणीटंचाईमुक्तचा निर्धार

भरत शास्त्री -- बाहुबली --दुष्काळामुळे राज्यात पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शासनाने जलयुक्त शिवार योजनेतून ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये २०१९ पर्यंत पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. त्यासाठी स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समन्वय व आढावा समिती स्थापन करण्यात येणार आहे.यापूर्वी जिल्हास्तरावर अशा प्रकारची समिती स्थापन केली होती; परंतु कामाची व्याप्ती व स्थानिक पातळीवरील समस्यांचा विचार करून जिल्हास्तराऐवजी तालुकास्तरावर या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमुळे सर्वच शासकीय यंत्रणा कार्यशील होणार आहेत. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राज्यात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जलयुक्त शिवारअंतर्गत बंधारे बांधले जाणार आहेत. बंधारे बांधण्यात येणाऱ्या जमिनी महसूल विभागासह वनविभागाच्या अखत्यारीतल्या असतात. त्यामुळे प्रत्येक विभागांची परवानगी घेणे सोपे होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रथम डिसेंबरमध्ये जिल्हास्तरीय समितीची स्थापना केली ; परंतु त्याची अव्यवहार्यता अभ्यासून सध्या तालुकास्तरीय आढावा समितीची स्थापना शासनाने करण्याचे निर्देश दिले आहेत.या समितीमध्ये स्थानिक विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. समितीचे उपाध्यक्ष प्रांताधिकारी, तर सचिव तहसीलदार असणार आहेत. पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी, उपजिल्हा कृषी अधिकारी व विविध विभागातील अधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. उपाययोजनेत जलयुक्त शिवार समिती सक्रिय सहभागी असणार आहे.