शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

पंधराशे रुपयाला पाण्याचा एक टँकर

By admin | Published: May 25, 2017 12:10 AM

शाहूवाडीतील आंबर्डेत पाणीटंचाई : नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ; आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे गावातील नागरिक व महिला यांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावातील नागरिकांना पंधराशे रुपये पाण्याचा टँकर, तर दोनशे रुपये पाण्याचे बॅरेल विकत घ्यावे लागत आहे. शासनाच्या तहसील व पंचायत समिती कार्यालयात निवेदन देऊनदेखील दखल घेतलेली नाही. ग्रामस्थ व महिला जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. शासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.शाहूवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आंबर्डे गाव आहे. या गावात चार वाड्या व दोन धनगरवाडे मिळून गाव वसले आहे. गावची लोकसंख्या २७०० एवढी आहे. गावातील नागरिकांसाठी शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ४९ लाख रुपयांची पाणी योजना बांधली होती. मात्र, ठेकेदाराने सदर योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे योजना बंद आहे. डोंगरातून सायफन पद्धतीच्या योजनेचे गाव पाणी पित होते; मात्र या योजनेचे पाणी कमी झाले आहे.आंबर्डे गावासह करपेवाडी, वाणेवाडी, रणवरेवाडी, आंबेवाडी आदींसह दोन धनगरवाडे यांचा समावेश आहे. गावासाठी दोन पाणी योजना असूनदेखील एक नादुरुस्त, तर दुसरी पाणी कमी झाल्यामुळे बंद आहे. गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तरीदेखील पिण्याचे पाणी मिळत नाही. गेले पंधरा दिवस गावात पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांना दररोज पंधराशे रुपये मोजून पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागत आहे. दोनशे रुपयांना पाण्याचे बॅरेल विकत घ्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांना निवेदने : तरीही दखल नाही१ धनगरवाडे, वाड्या-वस्त्यांतील नागरिकांना पाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर अंतरावर वणवण भटकावे लागत आहे. धनगरवाड्यावरील नागरिक व महिला यांना ओढ्याचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. लग्न समारंभासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. या नागरिकांना उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवत आहे.२ ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी शाहूवाडी तहसील कार्यालय, पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय यांना वेळोवेळी निवेदने देऊनदेखील संबंधित अधिकारी यांनी दखल घेतलेली नाही. ३ शासनाने तहसील कार्यालय यांना पाणीटंचाई असणाऱ्या गावात पाण्याचे टँकर पुरविण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील लाल फितीच्या कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. शासनाच्या संबंधित विभागाने आमची दखल घेतली नाही, तर जनआंदोलन करण्याचा इशारा सरपंच लक्ष्मी भोसले यांनी दिला आहे.गेले आठ दिवस शाहूवाडी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून निवेदने देऊनही आमची दखल घेतलेली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार. - सूर्यकांत पाटील, माजी सरपंच