शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

Kolhapur: गडहिंग्लजला पाणी देताना पालिकेची दमछाक, देखभाल दुरुस्तीचा मेळ बसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:13 IST

दृष्टिक्षेपात नळयोजना, पाणी पुरवठ्याचा लेखाजोखा.. जाणून घ्या

राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेची नळपाणी पुरवठा योजना तब्बल ४२ लाखांनी तोट्यात आहे. विशेष पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न आणि कामगार पगार, देखभाल दुरुस्ती, जलशुद्धीकरण, वीजबिल इत्यादी खर्चाचा मेळ घालताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे शहरवासीयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.आजमितीस शहराची लोकसंख्या सुमारे ३५ हजार आहे. शहरात शिकायला येणारे विद्यार्थी आणि प्रवासी मिळून सुमारे ५० हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नगरपालिकेला करावी लागते. त्यासाठी हिरण्यकेशी नदीवर आधारित नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली आहे. दररोज माणसी १२० लिटर पाणीपुरवठा केला जातो. मीटर पद्धतीने पाणीपट्टी आकारली जाते. पहिल्या ७५ युनिटला घरगुती वापरासाठी केवळ २४० रूपये तर वाणिज्य वापरासाठी १०५० रूपये इतकी आकारणी केली जाते. (१ युनीट म्हणजे १००० लिटर पाणी)सध्या वाढीव हद्दीतील उपनगरांसह शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी सुमारे ४७ लाखांच्या नव्या नळयोजनेचे काम गतीने सुरू आहे. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा असली तरी त्यावरील खर्चावर आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनावरील नियंत्रणासाठी नागरिकांनीच पुढे येण्याची आवश्यकता आहे.

दृष्टिक्षेपात नळयोजना

  • शहराची लोकसंख्या : ३५८८४
  • घरगुती नळजोडण्या : ८७३९
  • वाणिज्य नळजोडण्या : २९०

पाणी पुरवठ्याचा लेखाजोखा २०२३-२४

  • मालमत्ताकराच्या उत्पन्नापैकी १५ टक्के : ७८,२५,२९९
  • विशेष पाणीपट्टीद्वारे जमा रक्कम : १,२७,३२,२४६
  • नवीन नळजोडणीची जमा रक्कम : ५०,५००
  • कामगार पगार, निवृत्तीवेतन, अंशदान इत्यादी : ३२,२०,४५९
  • देखभाल दुरुस्ती खर्च : ६९,५७,८४३
  • जलशुद्धीकरणासाठी रसायने, तुरटी, टीसीएल खरेदी : २,९४,४००
  • वीजबिलाचा खर्च : १,२३,६९,८३५
  • पाटबंधारेकडून घेतल्या जाणाऱ्या पाण्याची रक्कम : १९,९०,७७९
  • एकूण उत्पन्न : २,०६,०८,०४५
  • एकूण खर्च : २,४८,३३,३१६
  • एकूण तोटा : ४२,२५,२७१

अत्यावश्यक सेवा म्हणून नफ्या-तोट्याचा विचार न करता नळपाणी पुरवठा योजना राबवली जाते. नदीतून पाण्याचा उपसा, शुद्धीकरण व देखभाल दुरुस्तीसाठी खूप खर्च येतो. त्यामुळे शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा, शुद्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी.- अनिल गंदमवाड, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी