शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

कोणती कामे अडवली ते सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2016 12:32 AM

आयुक्तांचा सवाल : वादावर दिवाळीनंतरच पडदा

कोल्हापूर : समज-गैरसमज, समन्वयाचा अभाव, वैयक्तिक अहंकार अशा हिंदोळ्यावर लटकलेल्या महानगरपालिका आयुक्त, नगरसेवक यांच्यातील संघर्षावर आता दिवाळीनंतरच पडदा पडला जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून इरेला पेटलेल्या या संघर्षामुळे प्रशासनावर कमालीचा तणाव असल्याचे दिसून आले. दरम्यान, मंगळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी, कामे होत नाहीत, असा जो आक्षेप आमच्यावर घेतला जातो, त्यासंबंधी कोणती कामे अडवलीत ते तरी सांगा, असा सवाल पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. ‘आयुक्त विरुद्ध नगरसेवक’ असा सामना गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत रंगला आहे. त्यातून नगरसेवकांनी अधिकारी वर्गावर आरोप करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यातच आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रकृतीचे कारण देत सोमवारी (दि. २४) झालेल्या महासभेदिवशी रजा घेतल्याने नगरसेवक अधिकच संतप्त झाले. या सभेत पुन्हा उपायुक्त विजय खोराटे यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आता बराच तणाव दिसत आहे. पत्रकारांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली आणि सोमवारच्या महासभेवेळी रजा घेण्याचे कारण विचारले, तेव्हा आपली प्रकृती बरी नसल्याने मी रजा घेतली होती. तशी पूर्वकल्पना आपण नगरविकास विभागाच्या सचिवांना दिली होती. जाणीवपूर्वक गैरहजर राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा त्यांनी केला. कामे होत नसल्याच्या आक्षेपाबाबत छेडले असता आयुक्त म्हणाले की, अधिकाऱ्यांकडून कामे होत नाहीत तर त्याचा जाब जरूर विचारला गेला पाहिजे. कोणी जाणीवपूर्वक कामे करीत नसतील तर त्याचा जाब नगरसेवकही विचारू शकतात किंवा माझ्याकडे तक्रार करू शकतात. जर कामे होत नाहीत असे वाटत असेल तर कोणती कामे अडवलीत ते तरी सांगावे. अधिकाऱ्यांकडे कोणतीही कामे थांबविली जात नाहीत. कोणी अडवणूक करीत असेल तर ते निदर्शनास आणावे. (प्रतिनिधी) नगररचना विभागाच्या सर्व फाईल उपायुक्तांकडे का दिल्या जातात, हा नगरसेवकांचा प्रश्न आहे. या विभागाच्या कामास आयुक्त म्हणून मी स्वत: जबाबदार असतो. पूर्वी झालेल्या निर्णयानुसार उपायुक्त कार्यालयात नगररचना विभागाच्या फाईल घ्यायच्या आहेत आणि उपायुक्तांच्या शिफारशींनी त्या माझ्याकडे येतात. सर्व फाईल मी व्यक्तिगतरीत्या तपासू शकत नाही; त्यामुळे प्रशासकीय पातळीवर त्यांची छाननी होते. त्यात काही चूक नाही. राहतो प्रश्न तो विजय खोराटे यांच्याकडेच कार्यभार का? आता कोणाला कोणते काम द्यायचे हा माझा प्रश्न आहे. जर खोराटे काम करीत नसतील, त्यांनी कोणाची अडवणूक केली असेल किंवा ते पैसे घेत असतील तर मला दाखवून द्या, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. - पी. शिवशंकर, आयुक्त. सुलभ शौचालय : महापालिका चालविणार बीओटी तत्त्वावर चालविण्यास दिलेली अकरा सुलभ शौचालये चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. जर त्यांना परवडत नसेल तर आम्ही ठेकेदाराने गुंतविलेली पन्नास टक्के रक्कम द्यायला तयार आहोत. महापालिकाच त्यांची देखभाल, दुरुस्ती करेल. परवडत नाही म्हणून शौचालये बंद ठेवून नागरिकांची गैरसोय होऊ नये अशी भूमिका आहे. लक्ष्मीपुरीतील सुलभ शौचालयसुद्धा महापालिका बांधेल. शौचालयाचे काम बंद ठेवा, असे कोणालाही सांगितलेले नाही, असे आयुक्तांनी सांगितले.