शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

निवडणूक खर्च घाईघाईने.. बिले मात्र जमा होतात दमादमाने; शासकीय खर्च कळेना

By इंदुमती सूर्यवंशी | Published: August 06, 2024 2:17 PM

उमेदवारांना तेवढे निकष

इंदुमती गणेशकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीनंतर महिन्याभरात उमेदवारांना खर्चाची बिले सादर करण्याचा नियम लावणाऱ्या शासनाला निवडणुकीवर शासनाकडून झालेल्या खर्चाची मात्र अजिबात घाई झालेली नाही. निवडणुकीला तीन महिने झाले तरी विधानसभानिहाय शासकीय विभागांनी झालेल्या खर्चाची बिले जिल्हा निवडणूक विभागाला सादर केलेली नाहीत. त्यामुळे शासनाची नेमकी किती रक्कम खर्ची पडली याचा ताळमेळच अजून लागलेला नाही. सध्या विभागाला खर्चासाठी २० कोटी रुपये मिळाले आहेत, तर निवडणूक आयोगाने झालेल्या खर्चाचा सुधारीत प्रस्ताव तत्काळ पाठविण्यास सांगितले आहे.जिल्ह्यात लोकसभेसाठी ७ मे रोजी मोठ्या चुरशीने मतदान झाले. त्यानंतर एक महिन्याने म्हणजे ४ जूनला मतमोजणी झाली. निवडणूक म्हटली की, उमेदवारांकडून खर्च होणे साहजिकच आहे. उमेदवारांना ९५ लाख रुपये खर्च करता येतात. पण जिल्ह्यात निवडणुकीची यंत्रणा राबविण्यासाठी निवडणूक विभागाला असे निकष नसतात. विभागाने निवडणुकीआधीच अंदाजित अपेक्षित रक्कम शासनाला कळवायची असते. त्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने मार्च महिन्यातच शासनाला ४५ कोटी ८० लाख ही रक्कम कळवून त्यासाठी तरतूद करून घेतली.मतदानाला तीन महिने आणि मतमोजणीला दाेन महिने झाले तरी विविध शासकीय कार्यालयांकडून जिल्हा निवडणूक विभागाला खर्चाची बिले सादर झालेली नाहीत. दुसरीकडे निवडणूक आयोगाने झालेल्या एकूण खर्चाचा सुधारीत खर्चाचा अहवाल तत्काळ पाठविण्यास सांगितले आहे.

अजून तपासणीच सुरूयाबाबत विचारणा केली असता, सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या पातळीवर अजून बिलांची तपासणी सुरू असल्याचे समजले. निवडणूक विभागाने यावर शुक्रवारी बैठक घेऊन सर्व विधानसभानिहाय सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना लवकरात लवकर खर्च सादर करण्यास सांगितले. त्यांच्याकडून बिले तपासून आल्यानंतर मुख्य कार्यालयाकडून बिले अदा केली जातात.

उमेदवारांना तेवढी महिन्याची मुदतउमेदवारांनी निवडणुकीवर केलेला खर्च मतमोजणीनंतर एक महिन्याच्या आत विभागाला सादर करायचा असताे. रोजच्या रोज खर्चाची बिले सादर करावी लागतात. शिवाय निवडणूक सुरू असतानाच्या काळात तीन ते चार वेळा निवडणूक खर्च अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जाते. उमेदवाराने जास्त रक्कम खर्च केली किंवा वेळेत खर्च सादर केला नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची तरतूद आहे.

कर्मचारी भत्त्यावर १३ कोटीनिवडणूक कामावरील नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भत्त्याची रक्कम अदा करण्याची अधिसूचना ३ तारखेला निघाली आहे. जिल्ह्यासाठी भत्त्याची रक्कम १३ कोटी ११ लाख इतकी होते, मात्र तेवढा निधी नसल्याने आता सर्वांना ठरलेल्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम दिली जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक 2024