शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

LokSabha2024: मतांच्या धुव्रीकरणावरच विजयाचे गणित, हातकणंगलेत तिरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 12:37 IST

विश्वास पाटील कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतांच्या धुव्रीकरणामध्येच विजयाचे गणित लपले आहे. सहा मतदारसंघांत जो चार लाखांचा आकडा ...

विश्वास पाटीलकोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतांच्या धुव्रीकरणामध्येच विजयाचे गणित लपले आहे. सहा मतदारसंघांत जो चार लाखांचा आकडा पार करील तो विजयाच्या दिशेने वाटचाल करील असे चित्र आहे. कोल्हापूरप्रमाणेच या मतदारसंघातही महायुतीकडे नेत्यांची संख्या जास्त आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी संघटनात्मक बळ, आर्थिक ताकद जास्त असली तरी ती प्रत्यक्षात मतापर्यंत किती पोहोचते हे महत्त्वाचे आहे. उद्धवसेनेचे सत्यजित पाटील यांच्याबद्दल नवीन उमेदवार म्हणून सहानुभूती आहे. राजू शेट्टी यांनाही शेतकऱ्यांसाठी राबणारा नेता म्हणून प्रतिसाद मिळत असल्याचा दावा ते करत आहेत.या मतदारसंघात एकूण १८ लाख ११ हजार मतदान आहे. गेल्या निवडणुकीत ६७ टक्के मतदान झाले होते. यावर्षी उन्हाचा तडाखा जास्त आहे. त्यामुळे ते ६५ टक्के झाले तरी ११ लाख ७७ हजार मतदान होईल. एकूण २७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे वंचितसह इतर २४ उमेदवारांनी ७७ हजार मते घेतली, तर ११ लाख मते राहतात. त्यामध्ये तीन प्रमुख उमेदवारांचा विचार केल्यास ३ लाख ६६ मतांची विभागणी होते; परंतु सद्य:स्थितीत ही लढत दुरंगीकडे सरकली आहे. त्यामुळेच ४ लाखांची जो उमेदवार बेगमी करील तो विजयाचा दावेदार होऊ शकतो, असे चित्र आज दिसते.

  • गेल्या निवडणुकीत खासदार माने यांना मुख्यत: इचलकरंजी शहर, हातकणंगले आणि शाहूवाडी मतदारसंघाने चांगले मताधिक्य दिले. शेट्टी यांना शिराळा, वाळवा आणि शिरोळने मताधिक्य दिले. या निवडणुकीत या दोन्ही गृहितकांना धक्का बसला आहे.
  • या निवडणुकीत स्थानिक उमेदवार म्हणून शाहूवाडी मतदारसंघ पाठीशी राहील, शिवाय शिराळा-वाळव्यातही मताधिक्य घेऊ असे सत्यजित पाटील यांना वाटते. सत्यजित पाटील हे हातकणंगले, शिरोळ व इचलकरंजी मतदारसंघाला नवखे आहेत; परंतु ती त्यांची कमकुवत नव्हे तर आज जमेची बाजू ठरत आहे. नवीन उमेदवार असल्याचा लाभ त्यांना होत असल्याचे दिसत आहे.
  • शिरोळ व वाळवा मतदारसंघातील मताधिक्य आपल्याला विजयापर्यंत नेईल असे शेट्टी यांना वाटते. ओबीसी, मुस्लीम मतेही आपल्या पाठीशी राहतील, असा विश्वास त्यांना आहे. इचलकरंजीत पुरेशी स्पेस तयार करू शकलो नाही हे त्यांनाही मान्य आहे. तिथे ते काही वेगळे गणित मदतीला येईल असे प्रयत्न सुरू आहेत. शिरोळमध्ये गतवेळेपेक्षा स्थिती चांगली असल्याचा अनुभव त्यांना येत आहे.
  • इचलकरंजी शहरात आपल्याला मताधिक्य मिळेल असे खासदार माने यांना वाटते. तिथे भाजपचे केडर आहे. फक्त मोदी यांच्याकडे पाहून मतदान करणारा मतदार आहे. हातकणंगले मतदारसंघ हा त्यांच्या घरचा मतदारसंघ आहे. त्यामुळे हातकणंगलेसह शिरोळमध्येही आपल्याला चांगली मते मिळतील असे त्यांना वाटते. प्रत्यक्षात इचलकरंजी शहरात न सुटलेला पाणी प्रश्न कितपत उसळी घेतो, हे देखील महत्त्वाचे आहे.
  • या मतदारसंघातील सहापैकी तीन आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. तीन महायुतीतील घटक पक्षांचे आहेत. भाजप व शिंदेसेनेचा स्वत:चा एकही आमदार नाही. आता विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेंद्र यड्रावकर हे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी माने यांना मत द्या, असा प्रचार करत आहेत; परंतु या तिन्ही आमदारांची मते कितपत माने यांच्या पदरात पडतात, हे निकाल ठरवणारे आहे.
  • गेल्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी घेतलेली सव्वालाख मते शेट्टी यांचा पराभव करून गेली. यावेळी वंचितचा फॅक्टर फारसा प्रभावी नाही; परंतु लढत मुख्य कोण दोघांत होते आणि तिसरा कुणाची किती मते घेतो, यावरच विजयाचे गणित अवलंबून राहील.
  • गेल्या निवडणुकीत मराठा मतांचे धुव्रीकरण माने यांना पहिल्याच प्रयत्नांत खासदार करून गेले. यावेळी ही मते कितपत विभागतात की कुण्या एकाच्याच पारड्यात जातात हा कळीचा मुद्दा आहे. सध्या तरी ती एकाच दिशेने एकवटत असल्याचे वातावरण दिसत आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४hatkanangle-pcहातकणंगलेdhairyasheel maneधैर्यशील मानेRaju Shettyराजू शेट्टीSatyajit Patilसत्यजित पाटील