शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, ९ मार्चला कृती समिती मुख्य न्यायाधीशांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 11:38 AM

जोपर्यंत खंडपीठाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत लढा थांबणार नसल्याचा निर्धार

कोल्हापूर/मुंबई : कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याशी ९ मार्चपूर्वी सकारात्मक चर्चा करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांत भेट घेऊन करण्याचा निर्णय मुंबईत सहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत गुरुवारी झाला.जोपर्यंत खंडपीठाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत लढा थांबणार नसल्याचा निर्धार करण्यात आला. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील महिला विकास महामंडळ सभागृहात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह स्थनिक बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ व वकिलाची बैठक कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने झाली.पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर खंडपीठासाठी यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाला मागणीचे पत्र दिले आहे. आवश्यक त्या सुविधा, निधीचीही तरतूद केली आहे. यापुढे महत्त्वाचा टप्पा आहे. ९ मार्चला खंडपीठ कृती समिती व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्यात बैठक आहे. त्याआधी मुख्यमंत्री अथवा अन्य विभागाचे मुख्य सचिव यांच्यामार्फत मुख्य न्यायाधीशांना खंडपीठाबाबत चर्चा करून प्रथम सर्किट बेंचचा पहिला टप्पा पूर्ण करावा, अशी मागणी करण्यात येईल.विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले, कोल्हापुरात खंडपीठ स्थापनेला विरोध नसल्याचे स्पष्ट करत औरंगाबाद, नागपूर येथे खंडपीठ होऊ शकते तर कोल्हापुरात का होऊ शकत नाही. कोल्हापुरात खंडपीठ स्थापना केल्यास मुंबईचे महत्त्व कमी होईल असे काही जणांचे मत आहे त्यात तथ्य नाही. लोकांना वेगाने न्याय मिळावा त्यासाठी न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. खंडपीठासाठी आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याबरोबर ९ मार्चपूर्वी सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी पुढाकार घेऊ, शेवटी खंडपीठ नाही तर सर्किट बेंच तर घेऊच.जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, कोल्हापूर खंडपीठासाठी आम्ही सर्व जण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सहा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी कोल्हापूर येथेच खंडपीठ व्हावे, असे एकमत असल्याची मागणी न्यायमूर्तींपर्यंत पोहोचवावी, अशी विनंती करू.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन व्हावे यासाठी २०१४ साली आम्ही प्रस्ताव पाठवला होता. यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हे वेळोवेळी प्रयत्न केले आहेच; मात्र अद्याप सर्किट बेंच हा प्रस्ताव पुढे गेलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्याशी चर्चा करून सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावावा.यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार वैभव नाईक, आमदार सुमन पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार अरुण लाड, राजन साळवी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार राम सातपुते, आमदार सदाभाऊ खोत, आमदार रणजितसिंह निंबाळकर,यांच्यासह कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, सचिव विजयकुमार ताटे- देशमुख, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाडगे, ॲड. संदीप चौगुले, ॲड. संकेत सावर्डेकर, ॲड. सुशांत चेंडके, ॲड. संग्राम शेळके, ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. प्रकाश मोरे, ॲड. प्रशांत चिटणीस, ॲड. सूर्यकांत चौगुले, ॲड. अजित मोहिते, ॲड. विजय महाजन, ॲड. विजयसिंह पाटील, ॲड. इंद्रजित चव्हाण, ॲड. मंदार तोरणे, ॲड. प्रताप जाधव, ॲड. उमेश मानगावे, आर. के. पोवार, दिलीप देसाई, बाबा पार्टे, सचिन चव्हाण, गुलाबराव घोरपडे, बाबा इंदुलकर, राजेखान जमादार आदी उपस्थिती होते.

झारीतील शुक्राचार्यांना रोखा..ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर खंडपीठ व्हावे यासाठी कोणाचेही दुमत नाही. पुण्यामुळे कोल्हापूर खंडपीठ थांबले असल्याची चर्चा होती, मात्र आता ती मागे पडली आहे. मुंबई, पुणे, ठाणे या सर्वाधिक जीडीपी असलेल्या महानगरपालिका आहेत. या जिल्ह्यातील दाव्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे दावे कमी होणार नाहीत या बाबी पटवून द्याव्या लागतील. मुुंबईतील विरोध करणाऱ्या काही शुक्राचार्यांना रोखावे लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय