शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

गाजलेल्या निवडणुका : श्रीपतराव बोंद्रे-मारुतीराव खाडे यांच्यातील लढत संस्मरणीय, निवडणुकीत एक-दोनच सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:19 IST

वर्गणी काढून खाडेंना केले उभे

कोल्हापूर : सांगरुळ विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतरच्या दुसऱ्या म्हणजेच १९८० च्या निवडणुकीत विद्यमान आमदार श्रीपतराव बोंद्रे (दादा) व मारुतीराव खाडे (बाबा) यांच्यात काटा लढत झाली होती. या लढतीत गोविंदराव कलिकते (साहेब) यांनी रंगत आणली होती. तिरंगी लढतीचा फटका खाडे यांना बसला आणि त्यांचा अवघ्या ३६६३ मतांनी पराभव झाला. बोंद्रे यांच्याविरोधात आव्हान निर्माण करून दिलेल्या निकराच्या झुंजीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती.महाराष्ट्रात १९७८ ला विधानसभा मतदारसंघांची पुर्नरचना झाली आणि ‘करवीर’ व ‘राधानगरी’तील गावांचा समावेश करून ‘सांगरुळ’ मतदारसंघ अस्तित्वात आला. येथून पहिल्या निवडणुकीत श्रीपतराव बोंद्रे व गोविंदराव कलिकते यांच्यात सामना झाला. बोंद्रे यांनी ९८३९ मतांनी कलिकते यांचा पराभव केला. त्यानंतर दोनच वर्षांत १९८० ला मध्यावधी निवडणुका लागल्या. यावेळी काँग्रेस (अर्स)कडून श्रीपतराव बोंद्रे, काँग्रेस (इंदिरा)कडून मारुतीराव खाडे तर ‘शेकाप’कडून गोविंदराव कलिकते अशी तिरंगी लढत झाली होती. श्रीपतराव बोंद्रे यांचे राजकीय वजन अधिक होते. त्या तुलनेत मारुतीराव खाडे साधा व रांगडा माणूस, त्यामुळे ही लढत एकतर्फी होईल, असा अंदाज होता. पण खाडे यांच्या उमेदवारीनंतर करवीर तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी राबवलेली प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांची एकजूट आणि सामान्य माणसांमधील सहानुभूतीच्या बळावर त्यांनी निकराची झुंज दिली. या लढतीत त्यांचा अवघ्या ३६६३ मतांनी पराभव झाला. गोविंदराव कलिकते हे थांबून एकास एक लढत झाली असती तर चित्र वेगळे दिसले असते, असे त्यावेळी प्रचारात सक्रिय असणारे आजही सांगतात.वर्गणी काढून खाडेंना केले उभेमारुतीराव खाडे यांचे सांगरुळ परिसरासाठी खूप मोठे योगदान होते. त्यांनी निवडणुकीला उभे राहावे, यासाठी लोकांनी ५० रुपयांपासून १ हजारांपर्यंत वर्गणी काढून त्यांना दिली होती. गोरगरीब कार्यकर्ता स्वत:ची भाकरी बांधून महिना महिनाभर प्रचारासाठी घरापासून लांब असायचा.

अखंड निवडणुकीत एक-दोनच सभात्यावेळी प्रचाराची हायटेक साधने नसायची. उमेदवारांची आर्थिक स्थितीही जेमतेमच असायची. त्यामुळे ना मोठ्या सभा, ना शक्तिप्रदर्शन, ट्रक, ट्रॅक्टर, सायकलवरून प्रचार यंत्रणा राबवली जात होती. खासदार, मंत्र्यांच्याच सभा अन्यथा थेट गाठीभेटींवरच प्रचाराचा भर असायचा.दृष्टीक्षेपात १९८० ची लढत..

  • एकूण मतदान : १ लाख ४ हजार ३५९
  • झालेले मतदान : ८१ हजार ७९६
  • टक्केवारी : ७८.७४ टक्के
  • श्रीपतराव बोंद्रे : २९ हजार ८७९ (३६.५३ टक्के)
  • मारुतीराव खाडे : २६ हजार २१६ ( ३२.०५ टक्के)
  • गोविंदराव कलिकते : २५ हजार ७०१ ( ३१.४२ टक्के)
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण