शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
3
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
4
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
5
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
6
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
7
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
8
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
9
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
10
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
11
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
12
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
14
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
15
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
16
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
17
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
18
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
19
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
20
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)

स्वातंत्र्यलढ्याचा पहिला हुंकार कोल्हापुरातील शिवाजी पेठेतून, बावडेकर आखाडा होता केंद्रस्थानी 

By संदीप आडनाईक | Published: August 16, 2024 11:50 AM

भूमिगत सैनिकांना मिळे आसरा

संदीप आडनाईककोल्हापूर : स्वातंत्र्य मिळून आज भारताला ७८ वर्षे पूर्ण झाली; परंतु त्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि ठिकाणांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. कोल्हापुरातही १९२४ पासूनच स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पडली होती. या स्वातंत्र्यलढ्याचा पहिला हुंकार शिवाजी पेठेतून निघाला. येथील पंत अमात्य बावडेकर आखाडा या चळवळीच्या केंद्रस्थानी होता. अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांचे ते आश्रयस्थान ठरले.

महात्मा गांधी यांची चळवळ १९२४ मध्ये सुरू झाली. याचे पहिले सत्याग्रही गोपाळ मेथे होते. कोल्हापुरात चरखा संघ आणि खादी उत्पादन संघ स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. स्वदेशी चळवळ, परदेशी कापडाची होळी, झेंडा सत्याग्रह अशी चळवळ सुरू झाली. त्यात कटकोळे, कट्टी आणि इतर कार्यकर्ते सहभागी होते. १९२७ मध्ये महात्मा गांधी कोल्हापुरात आले. त्यांनी तपोवन येथे चरखा संघाच्या इमारतीची पायाभरणी केली.यावेळी सत्यशोधक चळवळीतील वासुदेवराव तोफखाने, गोपाळ मेथे, खंडेराव बागल, कटकोळ आदी कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीत आले. १९३९ मध्ये भाई माधवराव बागल यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, त्यात माधवराव भोसले सहभागी झाले होते. ते शिवाजी पेठेतील. त्यांच्यामुळे अनेक सहकारी या चळवळीत ओढले गेले. तेथेच राष्ट्रसेवा दलाची शाखा त्यांनी सुरू केली.बावडेकर वाड्याच्या पलीकडील झाडीत चळवळीतील ज्येष्ठांच्या सभा व्हायच्या. पहिलवान भीमराव जाधव, श्रीराम चिंचलीकर, हरिभाऊ धर्माधिकारी, नाना धर्माधिकारी, प्रभाकर कोरगावकर येत. पुढे बावडेकर तालीम, वरुणतीर्थ तलावाच्या पश्चिमेस साळोखे हे शारीरिक शिक्षण आणि बौद्धिक घेऊ लागले. उभा मारुती चौकात श्रीपती चव्हाण, पत्नी बायनाबाई चव्हाण, मुलगी सुशीलाबाई, निवृती आडूरकर सूत कातत असत.कोल्हापूरसह सातारा, सांगली, तसेच अन्य जिल्ह्यांतील स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होऊन पंत अमात्य बावडेकर आखाड्यात मुक्कामाला असायचे. या तालमीतूनच संदेश दिले जायचे. बैठकीतून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जायची.

पहिली प्रभातफेरी पेठेत१९४१ मध्ये महायुद्ध झाले. सैन्यात भरती करण्यासाठी ब्रिटिश प्रचार करत होते. त्याला विद्यार्थी संघटनांचा विरोध होता. कोल्हापुरात बापू पाटील यांनी प्रभात फेरी काढण्याची जबाबदारी अण्णासाहेब चव्हाण यांच्यावर सोपवली. ३० जानेवारी आणि १४ नोव्हेंबरला पहिली प्रभात फेरी निघाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन