शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

Kolhapur: पुराची पातळी वाढणार, पाणी नाकातोंडात जाणार; ठेकेदाराच्या मग्रुरीला ‘राष्ट्रीय महामार्ग’ची संमती 

By राजाराम लोंढे | Updated: March 12, 2025 16:00 IST

शेतकरी जेल भरो आंदोलनाच्या तयारीत

राजाराम लोंढेकोल्हापूर : बालिंगे पुलाच्या पश्चिमेकडे दहा फुटाने मातीचा भराव घातल्याने पुराच्या पाण्याची उंची ७ फुटाने वाढणार आहे. ही उंची वाढत असताना त्यापेक्षा चार पटीने पाणी विस्तारणार असून, तेवढी घरे आणि जमीन पाण्याखाली जाणार आहे. संपूर्ण गावेच विस्थापित होणार असून, राष्ट्रीय महामार्गाने भरावात घातलेल्या मातीबरोबर पुराचे पाणीही शेतकऱ्यांच्या नाकातोंडात जाणार आहे. करवीर व पन्हाळा तालुक्यांतील शेतकरी जेल भरो आंदोलनाच्या तयारी आहेत.ठेकेदार बड्या माजी केंद्रीय मंत्र्यांचा निकटवर्तीय असल्याने तो ग्रामस्थांना दाद देत नाही.रस्त्याच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आहेत. राष्ट्रीय महामार्ग म्हणता, मग त्याच्या निकषानुसार रस्ता झाला का? बालिंगे ते खांडसरी दरम्यान शिवतेज ढाब्याजवळ तर रस्ता चक्क एकपाकी केला आहे. सोयीनुसार बाजूपट्ट्यांची रुंदी ठेवली आहे. पुढे रस्ता सुरू असतानाच मागे रस्ता उखडला आहे. बालिंगेकडील बाजूला तर आरसीसीची भिंत उभी केल्याने पाणी तुंबून ते बालिंगे गावात घुसणार आहे.

एकीकडे रस्त्याचा दर्जा सुमार असताना पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले जात आहे. आताच पन्नास गावे निम्मी स्थलांतरित करावी लागतात. जुलैनंतर ‘कुंभी’, ‘राधानगरी’, ‘तुळशी’, ‘कोदे’ ही धरणे भरली की त्यातून विसर्ग वाढतो. त्यात लहरी हवामानामुळे एकाच दिवशी गगनबावड्यासारख्या ठिकाणी १०० ते १५० मिलिमीटर पाऊस पडतो. अशा वेळी भोगावतीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग खूप वेगाने होतो. तो बालिंगे पुलातून त्याच गतीने पुढे सरकला नाहीतर मागील गावांना जलसमाधीच मिळणार आहे.कोगे पुलाच्या भराव्याने तुंबी वाढलीचार-पाच वर्षांपूर्वी कोगे (ता. करवीर) येथे कुंभी नदीवर पूल बांधताना पिलर कमी करून मातीचा भराव टाकला, तेव्हापासून करवीर व पन्हाळा तालुक्यांतील गावांत पाणी शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. आता, बालिंगे पुलाच्या भराव्याने ग्रामस्थांच्या नाकातोंडात पाणी जाणार आहे.

खासदार साहेब, जरा लक्ष द्यामहामार्ग कामाच्या दर्जासह मातीच्या भराव्याबाबत गेले तीन-चार महिने नागरिक व शेतकरी टाहो फोडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभाग दखल घेईना आणि ठेकेदार जुमानत नाही. महापुराने गावांना जलसमाधी मिळाल्यानंतर सांत्वनासाठी लोकप्रतिनिधी येणार का? खासदार साहेब, जरा लक्ष द्या, असा संताप जनतेतून व्यक्त होत आहे.बाजूपट्ट्यांवर व्यावसायिकांचे फलकबालिंगे ते कळेपर्यंत या मार्गावर हॉटेलसह इतर व्यावसायिक आहेत. अगोदरच काँक्रिटीकरणाच्या बाजूपट्ट्याला लागून गटर्स केली आहेत. व्यावसायिकांचे फलक बाजूपट्ट्यांवर असल्याने रस्ता एकेरीच सुरू राहतो. त्यात मध्यभागी दुभाजक नसल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.पाटबंधारेने ‘एनओसी’ दिली कशी?बालिंगे ते दोनवडे फाटा येथपर्यंत पुराच्या काळात सात फुटाने पाणी वाहते. प्रतिसेकंद किती घनफूट पाण्याचा विसर्ग त्यावेळी हाेतो, याची माहिती पाटबंधारे विभागाकडे आहे. ढिगाऱ्यामुळे तेवढे पाणी थांबून मागे दाबत नेणार आहे. मग, महामार्ग विभागाने ‘पाटबंधारे’ची ‘एनओसी’ घेतली का आणि कशी दिली? अशीही विचारणा होत आहे.

२०२१ च्या महापुरात बाधित कुटुंबेतालुका  - २०२१ बाधित - नवीन रस्त्यामुळे संभाव्य बाधितकरवीर  - ४५००  - ७७००पन्हाळा  -  १६००  - २५५०

अगोदरच कळे आणि कोगे पुलांच्या भराव्यामुळे गावे पुराच्या विळख्यात अडकली आहेत. या पुलामुळे तर शेतकरी उद्ध्वस्तच होणार आहे. हा भराव काढून तेथून संपूर्ण पिलरचा पूल उभा करावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावरची लढाई करावी लागेल. - बाळासाहेब खाडे (संचालक, गोकुळ)रस्ता व पुलाचे काम नागरिकांच्या सोयीसाठी नव्हे, गैरसोयीसाठीच आहे. पुलाचे पिलर व मोऱ्यांची संख्या कमी करून सरकार पैसे वाचवत आहे. पण, दरवर्षी या भराव्यामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी जे पैसे द्यावे लागतील, तेवढे आताच खर्ची केले तर मनस्ताप कमी होईल. - बाबासाहेब देवकर (माजी सदस्य, जिल्हा परिषद) 

दोन्ही बाजूला आरसीसी भिंत घालून भराव टाकल्याने पन्नास-साठ गावे विस्थापित होणार आहेत. ठेकेदार व महामार्ग विभागाला जनतेचा आक्राेश समजत नाही, पालकमंत्र्यांनी यावर मार्ग काढला तर ठीक, अन्यथा जनआंदोलन उभा करू. - अमर पाटील (शिंगणापूरकर)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गfloodपूर