शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

फो़डाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन, कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची टीका

By विश्वास पाटील | Updated: April 29, 2024 19:33 IST

शाहू छत्रपती यांना विजयी करण्याचे आवाहन

कोल्हापूर : पैसा आणि पक्षफोडीच्या आधारे सत्ता काबीज करणारे विधीनिषेधशून्य नेते यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा राजकीय नैतिकता गमावलेले राज्य अशी मलीन झाल्याची टीका ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार, माजी कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांच्यासह कोल्हापुरातील चाळीस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोमवारी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. या मान्यवरांनी लोकसभा निवडणूकीत कोल्हापुरातून शाहू छत्रपती यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.पत्रकात म्हटले आहे, भारतातील क्रांतीकारक सामाजिक सुधारणांचा इतिहास असलेले प्रगत व सुसंस्कृत राज्य अशी महाराष्ट्राची ओळख होती. परंतू ती आज मलिन झाली आहे. भारतीय जनता पक्ष हा आज निवडणूक आयोगाला स्वत:च्या अंकित ठेवून लोकशाहीसाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या निवडणूकांवर नियं६ण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे. त्याविरोधात आता निर्भय बनून खुलेपणाने बोलण्याची गरज आहे. एक विवेकी, लोकशाहीवादी व्यक्ती म्हणून देशातील लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. लोकसभेची २०२४ ची निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक घटना आहे. आता आपण जागे नाही झालो तर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत असे त्यात म्हटले आहे. पत्रकावर डॉ.यशवंत थोरात, डॉ. गणेश देवी, डॉ.अशोक चौसाळकर, सरोज पाटील, डॉ.उषा थोरात, डॉ. सुनिलकुमार लवटे, डॉ. राजन गवस, डॉ.मधुकर बाचूळकर, डॉ.टी.एस.पाटील, डॉ. भालबा विभुते, डॉ. विलास पोवार, सुरेश शिपूरकर, डॉ. शरद भुथाडिया, पवन खेबूडकर, डॉ.माया पंडित, डॉ.शरद नावरे डॉ.अरुण भोसले, दशरथ पारेकर, डॉ. भारती पाटील, डॉ..मेघा पानसरे, डॉ. मंजूश्री पवार, मीना सेशू, तनुजा शिपूरकर बाळ पाटणकर.डॉ.आय.एच.पठाण, व्यंकप्पा भोसले, हसन देसाई, गणी आजरेकर, एम.बी.शेख, प्रा.डी.यू.पवार, प्रसाद कुलकर्णी, हिंदकेसरी विनोद चौगले, माणिक मंडलिक, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, डॉ.उदय नारकर, अर्जुन देसाई, अनंत घोटगाळकर, भगवान चिले आदींच्या सह्याआहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४