शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
2
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
3
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
4
Gold Silver Price Rate Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह गोल्ड रेट
5
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
6
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
7
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
8
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
9
तक्रार दाखल करायला गेले,अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले; पोलिसांनी CPR देऊन प्राण वाचवले
10
IND vs BAN 1st T20 : हिंदू महासभेची ग्वाल्हेरमध्ये बंदची घोषणा! बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्याला विरोध
11
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
12
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
13
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
14
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
15
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
16
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
17
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
18
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
19
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
20
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले

Kolhapur: ‘बिद्री’ची चौकशी हे प्रकाश आबीटकर यांचेच पाप, के. पी. पाटील यांचा आरोप 

By राजाराम लोंढे | Published: June 24, 2024 5:32 PM

'आता विधानसभेचे घोडामैदान दूर नाही, जनताच हिशेब चुकता करेल'

कोल्हापूर : गेली दहा वर्षे ‘राधानगरी’च्या सामान्य माणसाची दिशाभूल करुन पन्नास खोक्याच्या आमिषाने गुवाहाटीला धूम ठोकणाऱ्यांना ‘बिद्री’च्या निवडणूकीत सभासदांनी चारीमुंड्या चित केले. त्या रागापोटी रात्रीच्या वेळी ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची चौकशी केली. कारखान्याच्या ६५ हजार सभासद व ऊस उत्पादकांच्या कष्टावर उभारलेल्या कारखान्याची बदनामी करण्याचे पाप आमदार प्रकाश आबीटकर यांनी केल्याचा आरोप ‘बिद्री’साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.के. पी. पाटील म्हणाले, सत्तेचे दहा वर्षे विकास कामे कमी आणि बिद्रीच्या प्रगतीला अडथळा जास्त अशी कालकीर्द आमदार आबीटकर यांची राहिली. केवळ बिद्री आणि के. पी. पाटील यांच्या द्वेषाने पछाडलेल्या आबीटकर यांनी गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये दिवस आणि रात्र बिद्रीची प्रगती कशी रोखता येईल यासाठीच ते शासन दरबारी प्रयत्न केले. अल्पभूधारक शेतकऱ्याला सभासद होता यावे यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्न त्यांनी न्यायप्रविष्ट केला. बिद्रीच्या प्रगतीचा शिलेदार ठरलेला सहवीज प्रकल्पाला अडचणीत आणण्याची भूमिका घेतली. इथेनॉल प्रकल्पाचे इरादा पत्र, लायसन कोणी आडवले हे कारखान्याच्या सभासदांना माहीती आहे. विस्तारीकरण मंजुरीच्या फायली सत्तेच्या जोरावर तब्बल दोन वर्ष निर्णयाविना अडकवून ठेवल्या. टेस्ट ऑडिटसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्यावर सत्तेचा गैरवापर करून दबाव टाकला.गुवाहाटी रिटर्न आमदारांना जनतेच्या मनातील खदखदची जाणीव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते कुरघोडीचे राजकारण करत आहेत. त्यातूनच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सत्तेच्या जोरावर दडपशाहीने बिद्रीची तपासणी करण्यास भाग पाडले. त्यांनी कितीही चौकशा करु देत, सत्य काय आहे ते लवकरच जनतेसमोरील येईल. असे के. पी. पाटील यांनी सांगितले.

सभासदांनीच योग्य मुहूर्त काढलापावसाचे कारण पुढे करत ‘बिद्री’ची निवडणूक सत्तेच्या जोरावर लांबणीवर टाकली. पण, सभासदांनीच योग्य मुहूर्त काढून कारखान्याच्या चिमणीवर वाकडी नजर टाकणाऱ्यांना योग्य जागा दाखवल्याचे के. पी. पाटील यांनी सांगितले.विधानसभेला हिशेब चुकता..देशात नावलौकिक मिळवलेल्या ‘बिद्री’ कारखान्याची जेवढी बदनामी करता येईल, तेवढी प्रकाश आबीटकर यांनी केली. आता विधानसभेचे घोडामैदान दूर नाही. त्या निवडणूकीत ‘राधानगरी’ची जनता त्यांचा हिशेब चुकता करतील, असा विश्वास के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेK P. Patilके. पी. पाटीलPrakash abitkarप्रकाश आबिटकर