शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोल्हापुरातील पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटता सुटेना, ग्रामस्थांची मानसिकता आड 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 29, 2023 12:43 IST

प्रत्येक वर्षी महापूर आला की त्याची चर्चा होते आणि पूर ओसरला की ती हवेत विरून जाते.

इंदुमती गणेशकोल्हापूर : पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सरकारने जागा दिली पाहिजे, जागा मिळाली तरी आम्ही जुन्या घराचा ताबा शासनाला परत देणार नाही. पूर येईल तेवढ्यापुरते शासनाच्या जागेत आणि इतर वेळी गावच्या घरात राहतो, या मानसिकतेमुळे प्रयाग चिखली, आंबेवाडीसह पूरग्रस्त गावांचे कायमचे पुनर्वसन रखडले आहे.गावातील मजबूत पिढ्यानपिढ्या राहत असलेली घरे सोडून माळावर जायला कोणीही ग्रामस्थ तयार होत नाहीत. सरकार म्हणते गावातील घरे सरकारच्या नावांवर करा, मगच तुमचे पुनर्वसन करतो, असा पेच तयार झाला आहे. प्रत्येक वर्षी महापूर आला की त्याची चर्चा होते आणि पूर ओसरला की ती हवेत विरून जाते.पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पूरबाधितांना सोमवारी तुम्ही राहते घर ताब्यात दिले तरच दुसरी जागा देऊन कायमस्वरूपी पुनर्वसन करू अन्यथा तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली जाईल असे स्पष्ट केले आहे. यावर आता गावांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. कोल्हापुरात २०१९ सालापासून एक वर्ष आडाने पूर येत आहे.

करवीरमधील प्रयाग चिखली, आंबेवाडी, वळिवडे ही गावे कायम पुराच्या छायेखाली असतात. त्यातील प्रयाग चिखली व वळिवडे येथील नागरिकांना कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी भूखंडाचे वाटप झाले आहे. पण वाटप झालेल्या भूखंडाची अवैध विक्री करून ग्रामस्थ पूरबाधित होणाऱ्या गावठाण भागातल्या जुन्या घरातच राहत आहेत. अनेक जण पूर आला की शासनाने दिलेल्या जागेत जाऊन राहतात आणि पूर ओसरला की पुन्हा गावात येतात असा अनुभव आहे. म्हणजे सरकारी जमीन तर हवी, पण जुने घरही सोडणार नाही, अशी ग्रामस्थांची मानसिकता आहे.

गाव म्हणून निर्णय घ्या...पालकमंत्री सोमवारी दिलेल्या भेटीदरम्यान ग्रामस्थांना एका पर्यायाची निवड करा असे सांगितले आहे. कायमचे पुनर्वसन हवे तर राहते घर, जागा सरकारच्या ताब्यात द्या, पूर आल्यावर तात्पुरते स्थलांतर करायचे असेल तर निवारा शेड उभारल्या जातील, त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल, पण गाव म्हणून सगळ्यांनी एकच निर्णय घ्या.

ताबा दिला की सातबारावर नाव लावणारशासनाने प्रयाग चिखली ग्रामस्थांसाठी १९८९ साली जमिनीचे प्लॉट पाडले होते. त्या सगळ्या सरकार नावे ठेवण्यात येणार आहेत. जे कुटुंब आपले राहते घर प्रशासनाच्या ताब्यात देईल. त्याचवेळी प्रशासन नव्या जागेच्या सातबारावर कुटुंबाचे नाव लावणार आहे.

शर्तभंगाचे प्लॉट परत घेणारशासनाने ग्रामस्थांना दुसरी जागा राहण्यासाठी दिली आहे. त्याची विक्री करून जुन्या घरात राहणे हे बेकायदेशीर व शर्तभंग करणारे आहे. अशा शर्तभंग झालेल्या जमिनी पुन्हा सरकार हक्कात घेतल्या जाणार आहेत.

पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी शासन सकारात्मक आहे. त्यासाठीच्या अटी-शर्तींची पूर्तता करून जे घराचा ताबा देतील त्यांचे नाव लगेचच सरकारी जमिनीच्या सातबारावर लावले जाईल. - स्वप्निल रावडे, तहसीलदार, करवीर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर