शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

दगडफेकीतील ४०० संशयितांवर गुन्हे, ३६ अटकेत; कोल्हापूर बंदला लागले होते हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 11:34 AM

शहर पूर्वपदावर, अपर पोलिस महासंचालकांकडून शहराची पाहणी

कोल्हापूर : सोशल मीडियातील आक्षेपार्ह मेसेज आणि स्टेटसच्या निषेधार्थ हिंदुत्ववाद्यांनी बुधवारी (दि. ७) पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्याने शहरात दंगल उसळली. दगडफेक करून नागरिकांच्या मालमत्तांचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात ४०० संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी ३६ जणांना अटक केली. तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, गृह विभागातील कायदा सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी गुरुवारी (दि. ८) शहरातील दंगलग्रस्त परिसराची पाहणी केली.शहरात ठिकठिकाणी दगडफेक करून दंगलखोरांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती. विशिष्ट समाजाची घरे, दुकाने आणि वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करून एकूण सुमारे ४०० संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जमावबंदीचे उल्लंघन करणे, मालमत्तांचे नुकसान करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, जमावाला चिथावणी देणे अशा विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून पोलिसांनी ३६ संशयितांना अटक केली. सर्व संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.तोडफोडीच्या ३० तक्रारी पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. दंगलीत सुमारे ३० रिक्षा, १० कार, ४० दुकाने, १८ दुचाकी, चिकनच्या दोन गाड्या, फळांच्या आठ हातगाड्या आणि एका चहाच्या गाडीचे सुमारे सहा लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. तक्रारींचा ओघ अजूनही सुरू असून, नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. राज्याचे गृह विभागातील कायदा सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी गुरुवारी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.अटकेतील संशयित

  • लक्ष्मीपुरी - १७
  • जुना राजवाडा - १६
  • शाहूपुरी - ३
  • अल्पवयीन ताब्यात - ३

१९ ते २५ वयोगटातील तरुणांचा तोडफोडीत समावेश

तोडफोडीच्या घटनांमध्ये बहुतांश तरुण १९ ते २५ वयोगटातील होते. अटकेतही याच वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. सर्व तरुण सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यांचे शिक्षण १२ वी ते पदवीपर्यंत झाले आहे. अनेक तरुण बेरोजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.तरुणांचे नातेवाईक हवालदिलअटकेतील तरुणांचे नातेवाईक गुरुवारी दिवसभर पोलिस ठाण्यांच्या बाहेर थांबून होते. आपल्या मुलाने दगडफेक केल्याचे त्यांना पटतच नव्हते. तरुणांना बुधवारी शिवाजी चौकात बोलवणाऱ्या नेत्यांपैकी एकही नेता गुरुवारी मुलांच्या जामिनासाठी प्रयत्न करताना दिसला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर