शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

काळम्मावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीचे काम वेगाने सुरू; पहिल्या टप्प्यात १२ मीटरपर्यंतचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 20:00 IST

पावसाळ्यापूर्वीच सुमारे ५० टक्के काम पूर्ण होण्याची शक्यता.

सोळांकुर : सिंचन व्यवस्थेवर कोणताही परिणाम न होऊ देता  काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीच्या गळती दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. धरणातील पाणी पातळी कमी होत जाईल तशी दुरुस्ती प्रक्रियाही टप्प्याटप्प्याने सुरू राहील. कामांचा जोर. असाच राहिल्यास पावसाळ्यापूर्वीच सुमारे ५० टक्के काम पूर्ण होईल, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्राकडून कळते.

धरणाच्या मुख्य भिंतीच्या गळतीचा प्रश्न गंभीर बनला होता. गळतीचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाणीसाठा ही कमी करण्यात आला होता. डिसेंबर २०२४ रोजी आलेल्या तज्ञ समितीच्या भेटीनंतर  जानेवारीत संक्रांती नंतर कामाला सुरुवात झाली आहे. गळती रोखण्यासाठी धरणाच्या मुख्य भिंतीला नऊ मोनोलीथमध्ये एकूण १३८ छिद्रे घेण्यात आली असून, त्याद्वारे ग्राऊटिंग प्रक्रिया सुरू आहे.  मुख्य भिंतीवरून बारा मीटरने होल मारून पूर्ण झाले आहेत. धरणातील पाणी जसे जसे कमी होत जाईल तशी दुरुस्ती प्रक्रियाही टप्प्याटप्प्याने वेगाने सुरू राहणार आहे. 

गळतीच्या दुरुस्तीचे काम तज्ज्ञांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सध्या धरणात ६० टक्के साठा म्हणजे  १४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचनासाठी आवश्यक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  यंदा धरणातील पाणी कमी झाल्यास पावसाळ्यापूर्वीच सुमारे ५० टक्के काम पूर्ण होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.  गळती काढत असताना सिंचन व्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ नये, याचीही विशेष काळजी घेतली जात आहे.  शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण