शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

काळा दिन: सीमाभागातील मराठी बांधवांनी निर्णायक लढ्यासाठी तयार रहावे, प्रा अच्युत मानेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 3:47 PM

लोकशाही मार्गाने व शांततेच्या मार्गाने करत असलेल्या आंदोलनाला कर्नाटक पोलीस मात्र दडपशाहीची भूमिका घेत आहेत.

निपाणी : गेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त काळापासून सीमाभागातील मराठी भाषिक अन्याय सहन करत आहे. लोकशाही मार्गाने व शांततेच्या मार्गाने करत असलेल्या आंदोलनाला कर्नाटक पोलीस मात्र दडपशाहीची भूमिका घेत आहेत. यामुळे आता सीमाभागातील मराठी भाषिकांनी निर्णायक लढ्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर या पुढचा लढा हा अधिक सक्षमपणे लढण्यात यावा यासाठी मराठी भाषिकांनी व नवीन पिढीने यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. अच्युत माने यांनी केले.निपाणी भाग मराठीकरण समिती, शिवसेना. म ए युवा समिती व समस्त मराठी भाषकांच्यावतीने निपाणी येथे काळा दिनानिमित्त निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.  यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर म ए समितीचे जयराम मिरजकर, प्रा एन आय खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे, युवा समिती कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, प्रा भारत पाटील, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.माने पुढे म्हणाले की, सीमाप्रश्नाचा हा लढा सर्वाधिक जुना व कायदेशीर व न्यायालयीन मार्गाने लढला जात आहे. या साठ वर्षाच्या काळात कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांची खैरात केली जाते. यापलीकडे सीमा वासियांसाठी काही केले जात नाही. आज निपाणी पोलीस प्रशासन मराठी भाषिकांवर दडपशाही करत आहे. यापूर्वी रस्त्यावरील लढाईला परवानगी होती.  आता बंद दाराआड चळवळीची सभा घेतली जात आहे. रस्त्यावर उतरला तर अटक करू अशा धमक्या हे प्रशासन देत आहे. यामुळे आता मराठी भाषिकांनी याचा विचार करून संघर्ष केला पाहिजे.जयराम मिरजकर म्हणाले की, भाषावर प्रांत रचना होताना बहुसंख्य मराठी भाषिक असलेला हा भाग मात्र कर्नाटकात डांबण्यात आला. पण आता न्यायालयाच्या अंतिम प्रक्रियेत हा प्रश्न असल्याने लवकरच हा प्रश्न सुटणार आहे. निपाणी येथील प्रशासन व्यापारी व मराठी भाषिकांवर दबाव आणत आहे. हे प्रशासनाने न करता आमचा आंदोलन करण्याचा घटनेने दिलेला हक्क येथील मराठी भाषिकांना द्यायला पाहिजे.बाबासाहेब खांबे म्हणाले की, एक नोव्हेंबर रोजी परंपरेने काळा दिन पाळून रस्त्यावर आंदोलन करण्याची आमची तयारी होती पण पोलीस प्रशासनाने आदल्या दिवशी उशिरा रात्रीपर्यंत आम्हाला परवानगी नाकारली. रस्त्यावर उतरला तर अटक करू अशी धमकी दिली व त्याचबरोबर वारंवार विनंती केल्यानंतर बंद दाराआड निषेध करण्याचे सांगितले. या कार्यक्रमाला नवनाथ चव्हाण, स्वरूप परीट, नंदकुमार कांबळे, बाबासाहेब मगदूम, प्रकाश इंगवले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे...या कार्यक्रमात रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे... निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक