शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

निवडणूक जुमल्याचे नवीन नाव गॅरंटी, आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 17:21 IST

'दहा वर्षांत बहुमतातील भाजप सरकारने देशाची वाट लावली'

कोल्हापूर : भाजपच्या निवडणूक जुमल्याचे नवीन नाव गॅरंटी असल्याची टीका शिवसेना (ठाकरे गट) युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी करवीर तालुक्यातील उचगाव येथे बोलताना केली. गेल्या दहा वर्षांत बहुमतातील भाजप सरकारने देशाची वाट लावली, असा आरोप ठाकरे यांनी केला. कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ठाकरे बोलत होते.भाजपने सत्तेत येण्यापूर्वी १५ लाख रुपये खात्यात टाकण्याचे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, रोजगार देण्याचे, अशी विविध आश्वासने दिली होती; पण ती पूर्ण केली नाहीत. नंतर त्यांनी सांगितले की, हा निवडणूक जुमला होता. आता याच जुमल्याचे नाव गॅरंटी असे ठेवले आहे. गेली दहा वर्षे सत्तेत असतानाही त्यांनी जनतेच्या मनातील बात जाणून घेतली नाही, असे ठाकरे म्हणाले.आपल्या विरोधात बोलणाऱ्यांवर कोणी आरोप केला की, त्यांना लगेच जेलमध्ये टाकले जाते. असले हुकूमशाही सरकार मागच्या ७५ वर्षांत पाहिले नाही. दहा वर्षे सत्ता भोगल्यानंतर भाजपचे नेते काँग्रेसने काय केले, असे विचारत आहेत. सत्ता असताना तुम्ही काय केले, ते सांगा, असे आव्हानही ठाकरे यांनी यावेळी दिले.नोटाबंदी केल्याने काळा पैसा परत आला का, देशातील आतंकवाद संपला का, देशातील शंभर शहरे ही स्मार्ट सिटी होणार होती, ती झाली का, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली. यावेळी उमेदवार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, अरुण दुधवडकर, संजय पवार, विजय देवणे, व्ही.बी. पाटील, रविकिरण इंगवले, सरपंच मधुकर चव्हाण उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Aditya Thackreyआदित्य ठाकरेShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीBJPभाजपा