शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

दस्त नोंदणी वाढली, पण कार्यालये कमी होणार: कर्मचाऱ्यांवरील ताण वाढणार

By विश्वास पाटील | Published: September 21, 2024 1:38 PM

स्वइमारतच नाही

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची संख्या वाढत असल्याचे मान्य करणाऱ्या राज्य सरकारने त्यासाठी नवीन कार्यालये सुरू करण्याऐवजी प्रत्येक कार्यालयाने दस्त नोंदणी करण्याच्या मानक संख्येत शुक्रवारी वाढ केली. शहरी भागातील जिथे ८ हजार वार्षिक दस्त होत होते त्यांनी आता १२ हजार दस्त नोंदणी करावी लागणार आहे. दस्ताची संख्या वाढल्यास काही कार्यालये बंद करावी लागतील अशी भीती कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात किमान ८ हजार दस्तनोंदणीची संख्या शासन आदेशाने निश्चित केली. महसूल व वनविभागाने हा आदेश काढला आहे.वाढते नागरीकरण तसेच औद्योगिकीकरणामुळे स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्यातील विविध दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या दस्त संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे राज्य सरकारनेच या आदेशात मान्य केले आहे. कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात वर्षाला सरासरी ८ हजारांहून जास्त दस्त नोंदणी झाल्यास त्या कार्यक्षेत्रात नवीन दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची आवश्यकता असल्याने नवीन कार्यालयाची निर्मिती व त्यासाठीची आवश्यक पदनिर्मिती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत राज्याच्या विकासाचे चक्र मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या शहरांपुरतेच मर्यादित न राहता सगळीकडेच गतिमान झाले आहे. त्यामुळे दस्त संख्या वाढल्याने नागरिक, लोकप्रतिनिधींकडून नवीन कार्यालये सुरू करण्याची मागणी होत आहे. सरकारने त्या मागणीला फाट्यावर मारून पुन्हा आहे त्याच कार्यालयातील दस्त नोंदणीची संख्या मात्र वाढवली आहे. बहुतांशी कार्यालयात लिपिक संख्या कमी आहे. संगणक ऑपरेटरचे काम खासगी कंपनीकडे दिले आहे.

कोणते व्यवहार वाढले..?

  • खरेदी-विक्री
  • तारण गहाण खत
  • बक्षीस व मृत्युपत्र
  • वटमुखत्यारपत्र
  • विक्रीचा करार

स्वइमारतच नाहीराज्यातील बहुतांशी दुय्यम निबंधक कार्यालये खासगी जागेत आहेत. तिथे चांगल्या सुविधा नाहीत. एक व्यवहार असला तरी किमान आठ ते दहा लोक कार्यालयात येतात. त्यांना बसायला जागा नसते. एक व्यवहार होण्यासाठी सरासरी तासाचा वेळ लागतो. या सोयीसुविधांकडे लक्ष द्यायला शासन तयार नाही.

  • राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये : ५२०
  • वर्षाला सरासरी दस्त नोंदणी : प्रत्येकी ८०००
  • शहरी व ग्रामीण भागातही प्रत्यक्ष दस्त नोंदणी सोबतच्या ई-रजिस्ट्रेशन प्रणालीवर लिव्ह ॲण्ड लायसन्स व नोटीस इंटिमेशन फायलिंगच्या प्रमाणात वाढ. 
  • कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यालये : एकूण १८
  • कोल्हापूर शहर : ०४
  • इचलकरंजी,कागल तालुका : प्रत्येकी : ०२
  • तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी : ०१
  • कोल्हापूर शहरातील चार, शिरोळ व हातकणंगलेमधील प्रत्येकी एक अशा सहा कार्यालयांतच सरासरी ८ हजार दस्त नोंदणी
  • इतर कार्यालयांत दस्त नोंदणी कमी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार